Manoj Jarange Patil all demands about maratha reservation and government response : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने आज (दि.2) तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे आदेश दिल्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याकडे पोहोचलं. यावेळी मनोज जरांगे यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत, त्या निर्णयांचा जीआर द्यावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या मागण्या केल्या होत्या? आणि सरकारने त्यांना कोणतं उत्तर दिलं? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..