LIVE UPDATES | वसईत कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

लॉकडाऊनमध्येही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालं आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळालं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Apr 2020 09:39 PM
मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटल मध्ये उपचार घेणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हा तरूण वसईच्या पापडी परिसरात राहत होता. 19 मार्च पासून तो फोर्टिस हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होता. त्याला रक्ताचा कॅन्सर देखील झाला होता. गुरुवारी त्याची फोर्टिस रुग्णालयात तपासणी केली असता त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला,अशी माहिती वसई पोलिसांनी दिली आहे. या तरुणाचा मृतदेह काल वसईत आण्यात आला होता. मात्र रात्री उशिरा पर्यंत पोलिसांनी या तरुणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यावर या इसमाचा मृतदेह मुंबई येथे नेण्यात आला. मात्र कोरोना रुग्णाचा मृतदेह हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांच्या ताब्यात दिला कसा हा सवाल उपस्थित झाला आहे.

वसई विरार क्षेत्रात आतापर्यंत 32 कोरोना बाधित रुगणाची संख्या झाली असून, यात आता चार मृत्यू झाले आहेत.
पालघर जिल्हयात आता क़ोरोना बाधितांचा आकडा हा 34 झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दोन विद्यार्थिनींसह विदर्भातील 36 विद्यार्थी अडकले. मलेशियात, नागपूरच्या तिरपुडे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे विद्यार्थी 15 डिसेंबरला सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मलेशियात दाखल झाले होते. भारतासारखाच 25 मार्च रोजी मलेशियात झाला आहे. लॉकडाऊनमुळे प्रशिक्षण कालावधी चार महिन्यांवर आणत विद्यार्थ्यांना देश सोडण्याचे फर्मान काढले आहे. भारताची आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असल्याने विद्यार्थी अडकले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अडचणीतून सोडवण्याची विनंती केली.

नवी मुंबईत आज दोन कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची भर. वाशी आणि नेरूळ येथील दोन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह
, नवी मुंबईची एकूण संख्या 33 वर गेली आहे.
शिवाजीराव भोसलेंना सहकारी बॅकेतील घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिदषदेचे आमदार अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसलेला मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना पुण्याला घेऊन येण्यासाठी आठ एप्रीलला परवानगी देण्यात आली. पुणे जिल्ह्यातील मावळ - मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी ही परवानगी दिली होती आणि त्यासाठी स्वतःच्या सहीच पत्रही दिलं होतं. पुण्यातील शिवाजीनगर पासुन ते मुंबईतील बांद्रा पुर्व पर्यंत प्रवास करण्यासाठी ही परवानगी दिली होती. भाजपचे पुण्यातील कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी त्यासाठी संदेश शिर्के यांच्यावर कारवाईची मागणी केलीय.
राज्याचे गृह मंत्रालयाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवाध कुटुंबीयांना बेकायदेशी मदत केली. याविरोधात गुप्ता यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केंद्रीय मंत्रालयाच्या सचिवांना लिहलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गारांसह जोरदार पाऊस. आजरा तालुक्यात तब्बल 1 तास अवकाळी पावसानं झोडपलं. लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारवा.
कोणतीही पर्यायी व्यवस्था उभी न करता प्रमुख शहरांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे फळे, भाजीपाला व फळभाज्या अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. दुसरीकडे साथीच्या काळात रोग प्रतिकारशक्ती तंदुरुस्त रहावी यासाठी ताजी फळे, फळभाज्या व पालेभाज्या यांचा आहारात समावेश असावा अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. बाजार समित्या बंद केल्यामुळे हा आहार शहरी ग्राहकांना न मिळाल्याने त्यांच्या रोग प्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होणार आहे. सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्राहकांना सहाय्यता व्हावी यासाठी शासनाच्या कृषी, सहकार व पणन या विभागांमार्फत शेतीमाल खरेदी व वितरणाची पर्यायी व्यवस्था उभी करावी. शेतकऱ्यांकडून तालुका स्तरावर शेतीमाल खरेदी करून नगर पालिका व नगर परिषदांच्या मार्फत शहरातील हौसिंग सोसायट्यांच्या मदतीने हा माल ग्राहकांपर्यंत पोहचावा व शेतकरी आणि ग्राहकांचे नुकसान टाळावे, अशी मागणी किसान सभा करत आहे.
ससून रुग्णालयातील 27 वर्षीय कोरोना बाधित तरुणाचा मृत्यू. आज सकाळी 10 वाजता मृत्यू. पुण्यातील मृतांचा आकडा 26 वर.
वाधवान बंधुंचा क्वॉरन्टाईनचा काळ संपल्यानंतर त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सुपूर्द केलं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. तसंच गरज भासल्यास सर्व आरोपींना विशेष विमानाने पाठवण्याची सोय करा असंही गृहमंत्रालय राज्य सरकारला सांगू शकतं.
अमिताभ गुप्ता यांची चौकशी करणं ही निव्वळ धूळफेक आहे. त्यांना निलंबित करुन त्यांच्याविरोधात अखिल भारतीय सेवा (शिस्त व अपील) नियम 8 अंतर्गत कारवाई करा, असला सल्ला आएएस अशोक खेमका यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातारा पोलिसांना वाधवान कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन करुन गुन्हा दाखल करण्याची सूचना दिली.

पार्श्वभूमी

मुंबई : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर झालं अन् क्षणात अनेकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेकजण शकडो किलोमीटर पायीच घरी निघाले. तर, काहींनी जीवघेणा प्रवास सुरु केला. यात दोघातिघांना आपला जीवही गमवावा लागला. अनेक ठिकाणी अवैध प्रवास करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई देखील केली. असे असताना दुसरीकडे सरकारच्या आशीर्वादाने श्रीमंत धेंडांना संचारबंदीत फिरण्याची मुभा मिळाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. लॉकडाऊनमध्येही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालं आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे.


 


दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना फोन करुन वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.


 


विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर
लॉकडाऊनदरम्यान वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजत या संदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील 23 जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळालं. त्यामुळे सामान्यांना एक नाही आणि श्रीमंत धेंडांना, त्यातही घोटाळ्याच्या आरोपींना संचारबंदीत फिरण्याची मुभा कशी काय मिळाली यांसह अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.


वाधवान प्रकरणात गृहमंत्र्यांचीच चौकशी करावी : चंद्रकांत पाटील












या प्रकारानंतर सरकारवर सर्व स्तरातर टीकेची झोड उठली. तसंच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी भाजपच्या अनेक नेत्यांनी केली. या प्रकरणात कारवाईला सुरुवात करत, गृहमंत्रालयाच्या ज्या गृह सचिवांचं पत्र वाधवान कुटुंबीयांकडे होतं, त्या अमिताभ गुप्ता यांची चौकशी होणार आहे. चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. यासंदर्भात अनिल देशमुख यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "मुख्यमत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना चौकशी होईपर्यंत तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे."





कोणाच्या आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? : फडणवीस
राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्र घेऊन वाधवान कुटुंब लॉकडाऊनमध्येही मुंबईहून महाबळेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर सरकारवर विशेषत: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात प्रश्न उपस्थित करत उत्तर देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात बलाढ्य आणि श्रीमंताना लॉकडाऊन नाही का? पोलिसांच्या अधिकृत परवानगीने काही जण महाबळेश्वरमध्ये सुट्टीला गेले आहेत. एवढ्या मोठ्या चुकीचे काय परिणाम होतील माहित असूनही वरिष्ठ आयपीएस अधिकारी असं कृत्य करेल, हे शक्य वाटत नाही. कोणाच्या आशीर्वादाने हे घडलं? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्पष्टीकरणं देणं गरजेचं आहे."


वाधवान कुटुंबाला संचारबंदीत प्रवासाची परवानगी कशी? किरीट सोमय्यांचं चौकशीचीसाठी राज्यपालांना पत्र


स्थानिकांच्या तक्रारीनंतर वाधवान कुटुंब ताब्यात
वाधवान कुटुंब मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिल परिसरातं राहतं. मुंबईहून हे कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचलं असता, स्थानिकांनी 23 जणांना पाहून याचा विरोध केला आणि लॉकडाऊनदरम्यान हे लोक महाबळेश्वरला कसे पोहोचले. काही रहिवाशांनी याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वरमध्ये पोहोचलेल्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या वाधवान कुटुंबातील सर्व सदस्यांना विलग करण्यात आलं आहे. महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्यांमध्ये कुटुंबातील महिला आणि मुलांचाही समावेश आहे.


'त्या' 23 जणांमध्ये कुणाचा समावेश?


कपिल वाधवान
अरुणा वाधवान
वनिता वाधवान
टीना वाधवान
धीरज वाधवान
कार्तिक वाधवान
पूजा वाधवान
युविका वाधवान
अहान वाधवान
शत्रुघ्न घागा
मनोज यादव
विनीद शुक्ला
अशोक वाफेळकर
दिवाण सिंग
अमोल मंडल
लोहित फर्नांडिस
जसप्रीत सिंह अरी
जस्टीन ड्मेलो
इंद्रकांत चौधरी
प्रदीप कांबळे
एलिझाबेथ अय्यापिल्लई
रमेश शर्मा
तारकर सरकार


लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला, गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळाल्याने खळबळ


देश लॉकडाऊन असताना मुंबईतून महाबळेश्वरात दाखल झालेल्या वाधवान कुटुंबामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सात गाड्यांमधून हे 23 जण मुंबईतून बुधवारी (8 एप्रिल) सायंकाळी साडेपाच वाजता महाबळेश्वरमध्ये आले. डीएचएसएल दिवान हौसिंग फाईनान्स यांच्या बंगल्यावर हे सर्वजण वास्तव्यास होते. 23 मध्ये बंगल्याचे मालक आणि कामगारांचा समावेश आहे. महाबळेश्वरातील गणेश नगर सोसायटी शेजारी हा बंगला आहे. या सर्वांना पाचगणीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखाने दिली.


कपिल वाधवान, धीरज वाधवान रियल इस्टेट कंपनी एचडीआयएल (HDIL), फायनान्स कंपनी डीएचएफएल (DHFL) सह अनेक कंपन्यांचे मालक आहेत. वाधवान बंधु डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी जामीनावर बाहेर आहे. याशिवाय वाधवान बंधु पीएमसी बँक घोटाळ्यातही आरोपी आहेत.


Anil Deshmukh | वाधवान प्रकरणी गृहमंत्रालय चौकशी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.