Rain UPDATES | पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Rain UPDATE | मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरुच आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं असून कोकणातही दमदार पाऊस सुरु आहे. याशिवाय कोल्हापुरातही पावसाचा जोर वाढला आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 05 Aug 2020 04:21 PM

पार्श्वभूमी
मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरुच आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात 3 आणि...More
मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरुच आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात 3 आणि 5 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस अद्यापही कायम आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचलं आहे. तर पालघरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक बंद झाली आहे.तिकडे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं आहे. रत्नागिरीत काही भागात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडं, विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे विजेचा लपंडाव सुरु आहे.तर कोल्हापुरातही जोरदार पाऊस कायम आहे. पंचगंगा नदीने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्र सोडलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाचा धुमाकूळ सुर असून धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे.
बेळगाव- पावसाने शहर परिसरात चांगली हजेरी लावली असून दिवस रात्र पावसाचा जोर असल्यामुळे नद्या,नाले,ओढे ओसंडून वाहत आहेत.शेतकऱ्यांना हा पाऊस वरदान ठरला आहे.दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून रात्रीपासून पावसाने चांगला जोर धरला आहे.सोसाट्याचा वारा वाहत असून पाऊसही मुसळधार सुरू आहे.मार्कंडेय नदीचे पावसामुळे पात्र विस्तारले असून नदीकाठच्या जमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत.शहरातील सखल भागात रस्त्यावर पाणी आले होते.खानापूरच्या मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.मलप्रभा नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे.गेल्या चोवीस तासात 72 मिमी पाऊस झाला आहे.तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे संपर्क तुटला आहे.शास्त्रीनगर,महात्मा गांधी कॉलनी या भागात घरात पावसाचे पाणी शिरले आहे.पावसामुळे बेळगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या आणि घराच्या भिंती पडण्याच्या
घटना घडल्या आहेत.पावसामुळे शहर आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे
घटना घडल्या आहेत.पावसामुळे शहर आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे