18व्या वर्षी निवडणूक लढवण्याचा अधिकार का नाही? : आदित्य ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 23 Dec 2017 08:34 PM (IST)
'मतदान जर 18व्या वर्षी करता येतं तर 18 किंवा 21व्या वर्षी निवडणूक का लढवता येत नाही?'

मुंबई : 'मतदान जर 18व्या वर्षी करता येतं तर 18 किंवा 21व्या वर्षी निवडणूक का लढवता येत नाही?' असा सवाल युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान 25 वर्ष वय असणं गरजेचं आहे. पण याच मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले? जास्तीत जास्त तरुण राजकारणात सक्रिय झाले तर त्यांचा देशातील राजकारणाला नक्कीच फायदा होऊ शकतो. असं मतही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.आदित्य ठाकरे सध्या युवा सेनेच्या अध्यक्षपदी असून ते वारंवार तरुणाईचे प्रश्न मांडताना दिसून येतात. संबंधित बातम्या :पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुकनशीब, डोकलाम विषय संपला, नाहीतर मुंबई विद्यापीठ तेही कारण देईल : आदित्य ठाकरेफुटबॉलप्रेमानं ठाकरे बंधूंची नेक्स्ट जनरेशन एकत्र, आदित्य-अमित ठाकरेंची भेटफडणवीस सरकारची डेडलाईन शिवसैनिक ठरवतील : आदित्य ठाकरे