मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या घोळामुळे राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची बदली करण्यात आली. पण विजयकुमार गौतम यांच्यासह एकूण 10 आयएएस अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे. सध्या राज्यभर सुरू असलेल्या कर्जमाफीच्या घोळामुळं विजयकुमार गौतम यांची बदली करण्यात आल्याचं समजतं आहे. आता गौतम यांच्याकडे वित्त विभागाच्या लेखा आणि कोषागार विभागाच्या प्रधान सचिवपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, पुणे आणि लातूर जिल्हा परिषदेचे सीईओंची देखील उचलबांगडी झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ डी.बी. देसाई यांची आता मुंबईत मंत्रालयात बदली झाली आहे. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक म्हणून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. तर लातूर जिल्हा परिषेदचे सीईओ एम.जी.गुरुसाल यांची नागपूरमध्ये मनरेगाचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

कुणाची बदली कुठे

 

क्रमांक

नावसध्याचा कार्यभार

बदली झाल्यानंतर मिळालेला कार्यभार

1वंदना कृष्णावित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य  सचिव (Accounts and Treasury)वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई (Reforms)
2.विजयकुमार गौतममाहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिववित्त विभागाचे प्रधान सचिव, मुंबई
3.आर.व्ही.राजीववित्त विभागाचे प्रधान सचिव (Reforms)वित्त विभागाचे (Expenditure) प्रधान सचिव, मुंबई
4.एस.व्ही.आर.श्रीनिवासनधारावी पुनर्विकास विभागाचे अधिकारीमाहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव, मुंबई
5.डी.बी.देसाईपुणे जिल्हा परिषदेचे सीईओआपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक, मुंबई
6.एम.जी.गुरुसाललातूर जिल्हा परिषदेचे सीईओमनरेगाचे आयुक्त, नागपूर
7.एस.डी.मनधारेमंत्रालयातील सचिव कार्यालयाचे सह सचिवपुणे जिल्हा परिषदेचे सीईओ
8.एस.जी.कोलतेमनरेगाचे आयुक्त, नागपूरउस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ
9.आर.डी.निवातकरआपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालकमंत्रालयातील सचिव कार्यालयाचे सह सचिव
10.विपीन इतानकरगडचिरोलीतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारीलातूर जिल्हा परिषदेचे सीईओ
  संबंधित बातम्याकर्जमाफीचा ऑनलाईन घोळ IT विभागाच्या प्रधान सचिवांना भोवला