शिक्षकांच्या 91 संघटनांनीही पाठिंबा देत या मोर्चात सहभागी होण्याचं ठरवलं आहे. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी याबाबत माहिती दिली.
दुसरीकडे बारावीच्या परीक्षा सुरु होण्याच्या तोंडावर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनीही पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या रोषाचा सामना सरकारला करावा लागणार आहे. सरकार हा प्रश्न कसं सोडवतं, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.