मुंबई : मेट्रो प्रकल्पासाठी गिरगावमधील 103 कुटुंबीयांना चाळ खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईविरोधात गिरगावमधील जनता आक्रमक झाली असून, थेट इच्छा मरणाची मागणीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


काय आहे प्रकरण?

गिरगावमध्ये होणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी 103 कुटुंबीयांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या बाबतची नोटीस देखील कुटुंबियांना मेट्रोच्यावतीने पाठवण्यात आली आहे.

प्रशासनाच्या या कारवाईविरोधात ‘आम्ही गिरगावकर’ संघटना आक्रमक झाली आहे. मेट्रोवर मनमानी कारभाराचा आरोप करत, या संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.