मुंबई: पेंग्विनच्या मृत्यूंनंतर आदित्य ठाकरेंवर होणारी अप्रत्यक्ष टीका काही थांबायचं नाव घेत नाहीय. मनसे आणि काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने आता या वादात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने काल मातोश्रीसह मुंबईच्या विविध भागात होर्डिंग लावले होते. मात्र, रात्रीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग फाडल्याचा प्रकार घडलाय.
मातोश्रीसोबतच शिवसेना भवन, राणीबाग, मंत्रालय आणि वरळी सी लिंक अशा ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हे होर्डिंग लावण्यात आले होते. दरम्यान, पेंग्विनच्या मृत्युमागे प्रशासनाचा निष्काळजीपणा हे कारण चुकीचे असल्याचं सांगत, महापौरांनी केली प्रशासनाची पाठराखण केली आहे. तसेच सविस्तर अहवालाशिवायच विरोधकांनी आरोप सुरु केल्याची टीका त्यांनी यावेळी केली. संबंधित बातम्या : एक पेंग्विन गेला, आता राणीच्या बागेत दुसरा पेंग्विन राणीच्या बागेतील एका मादी पेंग्विनचा जिवाणू संसर्गामुळे मृत्यू बालहट्टामुळे एका पेंग्विनचा मृत्यू, नितेश राणेंचा निशाणा पनवती लोकांकडून पेंग्विनबाबत टीका : उद्धव ठाकरे