ऑफीस सुटण्याच्या वेळी संगणक परिचालकांना आंदोलन केल्यामुळे घरी परतण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या संगणक परिचालकांचं वेतन गेल्या काही महिन्यांपासून थकीत आहे. यापूर्वीही त्यांना अधिवेशन काळात आंदोलन केलं, पण त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे आता त्यांना थेट रास्तारोको केला आहे.