मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. कलिना भूखंड घोटाळाप्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. मात्र भुजबळांना पैशांच्या गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर न झाल्यामुळे, ते तूर्तास जेलमधून सुटणार नाहीत.


एसीबीच्या विशेष न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना भूखंड घोटाळा प्रकरणात हा जामीन मिळाला आहे. मात्र पैशांच्या गैरव्यवहाराचं प्रकरण ईडीकडे आहे. त्यामुळे ही दोन प्रकरणं वेगळी असल्यामुळे, त्यांना पैशांच्या गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे भुजबळ तूर्तास तरी कोठडीतच राहणार.


भुजबळांना अटक

पैशांची अफरातफर आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात ईडीने छगन भुजबळांना 14 मार्च रोजी रात्री अटक केली होती. भुजबळांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तब्बल 11 तासांपासून छगन भुजबळांची अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली होती.

 

ईडी तपास करत असलेलं प्रकरण मनी लाँडरिंग म्हणजे पैशाच्या अफरातफरीचं म्हणजेच ब्लॅकमनी व्हाईट करण्याचं आहे. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या वेगवेगळ्या मनी लाँडरिंगच्या प्रकरणात सरकारला तब्बल 880 कोटी रुपयांचा फटका बसला. भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अनेक गैरव्यवहारांच्या प्रकरणांपैकी फक्त या एकाच प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचलनालय करत आहे.


 

संबंधित बातम्या


छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?


भुजबळांची अटक राजकीय हेतूनं प्रेरित: शरद पवार


छगन भुजबळ यांना दोन दिवसांची ईडीची कोठडी


पुढील दोन-चार वर्ष भुजबळ जेलबाहेर येणार नाही: किरीट सोमय्या


भुजबळांना अटक हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस: अंजली दमानिया


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अटक