ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटं उशिरानं आहे. त्यामुळे प्रवाशांचे बरेच हाल झाले आहेत. बोगद्याजवळ एक्सप्रेस बंद पडल्यानं याचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला आहे.
पारसिक बोगद्याजवळ एका मागे एक अशा सहा लोकल ट्रेन खोळंबून राहिल्या आहेत. ऐन कामाच्या वेळी खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, सिंहगड एक्सप्रेसचं इंजिन दुरुस्त करुन वाहतूक पूर्ववत करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न सुरु आहे.