BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर झाला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी अनेक विशेष तरतुदींची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. " आजच्या अर्थसंकल्पात शिक्षणावर जास्त भर देण्यात आला आहे. संवेदनशील राज्याच्या राजधानीचं हे प्रगतिशील बजेट आहे. महिलांसाठी महत्वाच्या गोष्टी आजच्या बजेटमध्ये असून पर्यावरणासाठी हे बजेट आहे. मुख्यमंत्री मुंबईचे असल्यामुळे मुंबईच्या विकासाचे प्रतिबिंब आपल्याला आजच्या अर्थसंल्पातून दिसत आहे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. 


आदित्य ठाकरे म्हणाले,  "मुंबईचा विकास म्हणजे शाश्वत विकास करण्याचे हे बजेट आहे. मुंबईचे सर्वच पैलू या बजेटमध्ये घेतलेले आहेत. जे नैराश्य केद्र सरकारच्या बजेटमधून दिसतं ते मुंबई पालिकेच्या बजेटमध्ये नाही. प्रत्येक व्यक्तीचा आवाज एकून आणि लक्ष देऊन हे बजेट तयार करण्यात आलंय. बीएमसी शाळेत 26 हजार विद्यार्थी वाढले आहेत. प्रत्येकवर्षी विद्यार्थी संख्या घटली असल्याचं चित्र पहातो. मात्र या वर्षी विद्यार्थी संख्या वाढलीय. CBSC आणि ICSC शिक्षण बोर्डाचे शिक्षण आपण मोफत आणत आहोत. त्याची उत्सुक्ता खूप आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. शिक्षणाचं बजेट आपण शाळांच्या डागडूजीसाठीही वापरत असून त्यात आता वाढ होत आहे."


"खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प महत्वाचा आहे. खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पातून हजार बाराशे कोटींच्या प्रकल्पातून जेवढं पाणी मिळणार आहे, तेवढंच पाणी आता उपलब्ध होणार आहे, तेही कमी वेळेत आणि कमी किमतीत. जंगल वाचवून खारे पाणी गोडे करून आपल्याला पाणी मिळणार आहे. जे जगभरात चांगले असते ते आमचा मुंबईत आणन्याचा प्रयत्न असतो, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. 


महत्वाच्या बातम्या