भाजपचे प्रत्युत्तर, प्रसाद लाड काँग्रेसवर 500 कोटींचा दावा ठोकणार
एबीपी माझा वेब टीम | 02 Jul 2018 07:44 PM (IST)
नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जागेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसाद लाड यांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप आज काँग्रेसने केला होता. आरोपानंतर तासाभरातच भाजप प्रवक्ते माधव भांडारी आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : “सिडकोच्या 24 एकर जागेबाबत काँग्रेसने केलेले आरोप खोटे असून पृथ्वीराज चव्हाण आणि संजय निरुपम यांच्यासह काँग्रेस पक्षावर 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे ,” असं म्हणत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिले आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जागेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसाद लाड यांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप आज काँग्रेसने केला होता. आरोपानंतर तासाभरातच भाजप प्रवक्ते माधव भांडारी आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.