मुंबई : मुंबई महापालिकेतच्या प्रचारात आता भाजपनंही भावनिक राजकारणास सुरुवात केली आहे. भाजपच्या सर्व म्हणजे 227 उमेदवारांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत प्रचाराचा श्रीगणेशा केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण देणाऱ्या या स्मारकाच्या अभिवादनानंतर उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली.


भाजपकडून मुंबई तोडण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप होतो आहे. तो दावा खोडून काढण्यासाठी भाजपनंही आता नव्या रणनीतीची सुरुवात केली.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या सर्व उमेदवारांचा मेळावा घेऊन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत या सर्वांना पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ देण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे मुंबईतील 227 उमेदवार हजर होते.

भाजपच्या 227 उमेदवारांनी घेतलेली शपथ जशीच्या तशी :