जवाहर द्वीपावर ही दुर्घटना घडली आहे. सायंकाळी साडे चारच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळते आहे.
ही आग मोठी असून गेल्या अनेक तासांपासून तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचे सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. तसेच आगीमध्ये नेमकं किती नुकसान झालं आहे याचंही माहिती मिळू शकलेली नाही.