काही दिवसांपूर्वीच वरप इथे मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या आणि त्यानंतर मांगरुळ इथे खासदार श्रीकांत शिंदेंनी लावलेल्या झाडांना लागली होती. राज्य सरकारच्या एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेत लावलेल्या झाडांना अज्ञातांनी आग लावल्याच्या संतापजनक घटना अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावात घडली होती. या वर्षीच्या जुलै महिन्यात कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही झाडं लावली होती.
राज्य सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होत अंबरनाथजवळच्या मांगरुळ गावात तब्बल एक लाख झाडं लावण्यात आली होती. मात्र या झाडांना आणि संपूर्ण डोंगराला अज्ञात समाजकंटकांनी आग लावली. यात थोडी-थोडकी नव्हे, तर तब्बल 20 हजार झाडं जळून खाक झाली होती.
कुणीही कितीही आगी लावल्या तरी जंगल निर्माण होणारच, असा विश्वास श्रीकांत शिंदेनीं व्यक्त केला होता. आता पुन्हा आग लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.