यापूर्वी महागाई भत्ता 125 टक्के इतका होता. तो आता 132 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. वाढीव महागाई भत्ता 1 जुलै 2016 पासून लागू करण्यात आला असून 9 महिन्यांची थकबाकी रोख स्वरुपात मिळणार आहे.
दरम्यान राज्य सरकारचे तब्बल 16 लाख कर्मचारी आणि 6 लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे.