विसर्जन मिरवणुकीमधील किरकोळ वादातून दाम्पत्यावर हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 16 Sep 2016 09:20 AM (IST)
कल्याण: दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या बेतुरकर पाड्यातील वयोवृद्ध दाम्पत्यावर हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील वाद्यांच्या आवाजाच्या कारणावरुन झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोनी आरोपींचा सध्या शोध सुरु आहे. कृष्णा एकनाथ वाघे, सुरेश उर्फ भुऱ्या रमेश वाघे आणि गोरखनाथ वाघे अशी तीन आरोपींची नावं आहेत. 12 सप्टेंबरला बेतुरकर दाम्पत्य अंगणात झोपले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. ज्यात लहू बेतूरकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पत्नी जया बेतुरकर या गंभीर जखमी झाल्या आहेत. संबंधित बातम्या: