- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- पुणे
- सातारा
- सांगली
- सोलापूर
- कोल्हापूर
- नाशिक
- जळगाव
- अहमदनगर
- अमरावती
- बुलडाणा
- यवतमाळ
- औरंगाबाद
- जालना
- परभणी
- हिंगोली
- बीड
- नांदेड
- उस्मानाबाद
- लातूर
- वर्धा
- चंद्रपूर
- गडचिरोली
झेडपी आणि पं समितीचा पहिल्या तासातच निकाल?
एबीपी माझा वेब टीम | 22 Feb 2017 03:48 PM (IST)
मुंबई: राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं. त्यांचा निकाल गुरुवारी जाहीर होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरु होणार आहे. प्रत्येक गण आणि गटाची एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी टेबलची मांडणी करण्यात आली. साधारणपणे एका जिल्हा परिषद गटात २० हजार मतदार असतात. एका गटात दोन पंचायत समिती उमेदवार आहेत. एकूण मतदानापैकी सुमारे ७० टक्के मतदान झाल्याने,एका गटाचा निकाल येण्यासाठी १४ हजार मतांची मोजणी केली जाणार आहे. यासाठी साधारणपणे दीड तासांचा वेळ लागू शकतो. म्हणजे सकाळी ११ वाजेपर्यंत बरचं चित्र स्पष्ट झालेलं असेल. यावेळी झालेल्या चौरंगी लढती पाहता, विजयी उमेदवारांच्या विजयाचा लंबक इकडून तिकडे जाताना दिसू शकतो. विजयी मतांचा फरक मोठा नसेल. त्यामुळेच निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोणत्या जिल्हा परिषदांचा निकाल?