राज्यातील बहुतांश शहरांचा पारा 7 अंश सेल्सिअसच्या खाली
एबीपी माझा वेब टीम | 11 Dec 2016 09:21 AM (IST)
मुंबई: राज्यात आज थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. राज्यातील बहुतांश शहराचा पारा 7 अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. आज अहमहनगरमध्ये नीचांकी म्हणजे 5.6 इतकं तापमान नोंदवलं गेलं. खासकरुन विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात सर्वाधिक थंडी जाणवते आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे येत्या आठवडयात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.