''सदाभाऊंना मंत्रिमंडळात कमी अधिकार आहेत.
निर्णय प्रक्रियेतही ते नसतात.
कॅबिनेटमध्ये त्यांना बसता येत नाही.
हे ओळखून त्यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा नाहीत.
सरकारचा उदोउदो करण्याचा आपण ठेका घेतलेला नाही.
सरकारचे प्रश्न सरकार पाहून घेईल. तुम्ही एक सामान्य राज्यमंत्री आहात.
त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत, हे आम्ही त्यांना सांगू.
इतर मित्रपक्षही कसे राहतात पाहा.
सदाभाऊ नवखे असल्याने उत्साहाच्या भरात जास्तच कौतुक करत आहेत.
पण योग्य वेळी त्यांना समजावून सांगू,'' असं राजू शेट्टी म्हणाले.
''कर्जमाफी हे शेतकऱ्यांसाठी सलाईन'' कर्जमाफी हे सलाईन आहे. मात्र सलाईन दिल्याने अत्यावस्थ रुग्ण बरा होतो असं नाही. पण सलाईन दिल्यानंतर पुढच्या उपचारासाठी त्याचं शरीर किमान प्रतिसाद तरी देतं. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची असेल आणि पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असतील तर शेतकऱ्याला कर्जमाफी देणं हा एकमेव उपाय आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.