कर्जबुडव्या उद्योगपतींची हजारो कोटींचे कर्ज सरकार माफ करते, तर शेतकऱ्यांनाच कर्जमाफी का नाही, असा सवाल विचारत नोटाबंदीतून काळा पैसा बाहेर येणार असेल, तर या पैशातून शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी विखे पाटलांनी केली.
शेतीमालाला हमीभाव द्या - विखे पाटील
शेतकरी गेल्या चार वर्षांपासून नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. कसेबसे पिकवलेल्या मालाला हे सरकार भाव देऊ शकलं नाही, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पुरेशी भरपाई देऊ शकलं नाही, शासकीय खरेदी केंद्रे सुरु करु शकलं नाही, अशी टीकाही विखे पाटलांनी केली.