मुंबईआगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अॅक्शन मोडवर आली आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची तयारीत आहे. राज्यातील सर्वच विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन सव्वा 200 पर्यंत जागा लढण्याचा विचार मनसेचा आहे. या विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याचा दौरा देखील करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या तयारीला वेग आला आहे राज्यात सध्या उमेदवारांची चाचपणीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे नेते वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी दिली आहे. 


राज्यात सव्वा 200 जागा लढण्याचा आमचा विचार- वैभव खेडेकर


राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा राज ठाकरे यांनी घेतला आहे. आम्ही विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. सोबतच आमच्यातले अनेक चेहरे हे विधानसभा निवडणूक लढवतील. महाराष्ट्रात मनसेला आशादायी चित्र आहे, हे एकंदरीत आढावा घेतल्यानंतर समजतंय. परिणामी, 288 जागांचा आढावा आम्ही घेतलेला आहे आणि त्यातील सव्वा 200 जागा लढण्याचा विचार आमचा असल्याची माहिती मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी दिली आहे. येत्या 25 तारखेला राज्यातील सर्व पदाधिकारी यांचा मेळावा मुंबईत होणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्या दरम्यान राज साहेबांचा राज्यात दौरा होईल, असेही ते यावेळी म्हणाले. 


राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे महायुतीचे नुकसान होण्याची शक्यता?


मनसे स्वबळावर लढणार या चर्चेबरोबरच ते महायुतीत जाणाऱ्या बाबत देखील चर्चा आहे. मात्र 2014 आणि 2019 विधानसभेसाठी मनसेला भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा दिल्याने मनसेला मोठा फटका बसला. त्यामुळे या निवडणुकीत ती चूक पुन्हा मनसे करणार नसल्याचं बोललं जात आहे.दरम्यान, राज ठाकरे यांच्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेमुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभेमुळे महायुतीला काही जागांवर फायदा झाल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र, राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्यामुळे भूमिकेमुळे महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


राज ठाकरे आजपासून पुढील काही दिवस आढावा घेणार


मनसेने विधानसभेसाठी 200-250 जागांची तयारी करायला सुरुवात केलेली आहे अशी माहिती मनसे नेत्यांनी महिनाभरापूर्वी दिली होती . यासंदर्भात महिनाभरापूर्वी निरीक्षक नेमून प्रत्येक मतदार संघाची चाचपणी करण्यात आली आहे. चाचपणी केलेल्या नेत्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाचा पुढील काही दिवस आढावा घेणार आहेत. त्यानंतर एकुणात अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या