औरंगाबादमध्ये शिवसेनेनं आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात उद्धव बोलतं होते. राज्यात आयपीएलनंतर बीअर कंपन्यांचं पाणी तात्काळ बंद करण्याची मागणी होत आहे. मद्यप्रेमींना पिण्यासाठी पाणी आहे. पण तहानलेल्यांना पिण्यासाठी पाणी नाही. हीच शोकांतिका माझानं मांडल्यानंतर, आता मराठवाड्यातल्या दारु कंपन्यांविरोधात लोकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.
आता सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेनंही हीच मागणी केल्यानं सरकार यावर काय उत्तर देतं. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.