"मुख्यमंत्री विरोधात असताना कर्जमाफी मागायचे,
आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रुपांतर झाले.
सरकार बदलले पण प्रश्न सुटत नाहीत.
मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय, शेतकरी कर्ज मुक्त करा,
माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देतील",
असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. साल्यांची सालपटं काढतील "गाडीवरचा दिवा गेला पण यांच्या मनातला गेला नाही. दानवेंच्या वक्तव्याने तळपायाची आग मस्तकात गेली. आता शेतकरी रडणार नाही साल्यांची सालपटं काढतील", असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आम्ही कपाळकरंटे नाही. कर्जमाफी तात्पुरता इलाज असेल, पण तात्पुरता तरी इलाज करा, पुढचं पुढं बघू, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं. तूर घोटाळ्याची चौकशी करा आता मन की बात नाही, शेतकऱ्याची बात करा. शेतकरी तूर तूर करतोय आणि हे सत्तातूर झाले आहेत. तूर घोटाळ्याची आधी चौकशी करा. विक्रमी उत्पादन होणार होतं तर आयात करण्याचा निर्णय कुठल्या सुपीक डोक्यातून आला त्याचं आधी मॅपिंग करा, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. 15 लाख खात्यावर भरा शेतकऱ्यांची कर्ज माफीची मागणी मी मागे घेतो. पण त्यासाठी तुम्ही लोकांना त्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये भरण्याचं आश्वासन पूर्ण करा, असंही उद्धव यांनी नमूद केलं. सरकारमध्ये शेतकऱ्याबद्दल बोलणारी 10 तोंडं झाली आहेत. नोटबंदीच्या काळात गैरव्यवहार झाले म्हणून जिल्हा बँकांवर बंधन लावले, मग खाजगी बँकांवर कारवाई करण्याची हिंमत सरकारमध्ये आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकदा मदत दिली की माज इतका चढतो की तुम्हाला साले म्हणा नाही तर आणखी काही म्हणा, मला राज्यात अशांतता पसरवायची नाही. पण जे धुमसत आहे त्याकडे वेळीच लक्ष द्यावे लागेल, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, फक्त साथ देऊ शकतो, शेतकऱ्याला साथ द्यायला आलोय, असं त्यांनी नमूद केलं. नारायण राणेंना टोला विरोधी पक्षात नालायक लोक बसले आहेत. आम्हाला सत्ता सोडायला सांगतात आणि स्वतःच भाजप प्रवेशासाठी गुप्त बैठक करतात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणेंवर प्रहार केला. समृद्धी महामार्गाला विरोध यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध केला. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करुन समृद्धी महामार्ग नको. दोन्ही राजधान्या जोडाव्या, पण शेतकऱ्यांचा सत्यानाश करुन नाही, असं उद्धव म्हणाले.