मुंबई:   बाबरी जेव्हा पाडली तेव्हा हे सगळे 'उंदीर' बिळात  लपले होते.  भाजपकडे कोणतंही शौर्य नव्हतं. बाबरी पाडली त्या वेळी दंगली झाल्या त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई वाचवली. आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त दावा केला  त्यावर उद्धव प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ  शिंदेंनी राजीनामा द्यावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. 


उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपकडे शौर्य नव्हतं त्यावेळी मुंबई शिवसेनेनी वाचवली आहे. त्यावेळी पंतप्रधानांचं नााव देखील कुठेही नव्हतं.  बाबरी पाडली त्या वेळी दंगली झाल्या त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई वाचवली.  बाबरी मशिदीबाबत ही बातमी आली तेव्हा बाळासाहेबांना फोन आला तेव्हा ते बोलले माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे. आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत. 


चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल 


 आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे मोहन भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये. एका मस्तीत चंद्रकांत पाटील बोलतायत त्यांनी अडवाणींची मुलाखत पाहावी.


बाळासाहेबाांचे नाव घेऊ नये 


मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. आम्ही कायदा करा म्हणत होतो पण पंतप्रधानांनी हिंमत झाली नाही शेवटी निकाल कोर्टाने दिला. मिंधेंना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पण वापरु नये. बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाही. चंद्रकांत पाटील बोलले आहेत. श्रेयवादाचा प्रश्नच नाही. चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. ही भाजपची चाल आहे. ज्यांना कर्तृत्व नसत ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवलाय ते सहन होत नाही म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. यांचे गोमूत्रधारी हिंदुत्व. हिंदुत्वाचा बुरखा घातलाय. त्यांचा अत्यंत विकृत चेहरा त्यांचा आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत? की स्वतः च स्वतःला जोडे मारणार आहेत?  असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


 बाबरी कुणी पाडली? एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता : चंद्रकांत पाटील