‘सरकारच्या धोरणामुळे जेरीस आलेल्या उद्योजकांनी आंदोलन छेडल्यास मी स्वतः त्याचं नेतृत्व करेल.’ असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं. आज (शनिवार) कोल्हापूर दौऱ्यावेळी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला.
सरकारनं शेतकरी, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना देशोधडीला लावलेलं असलं तरी रामदेवबाबांसारखे नवे उद्योजकही पुढे येत आहेत. अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, याचवेळी उद्धव ठाकरेंनी सरकारच्या जाहिरातबाजीवरही हल्लाबोल केला. ‘मी खूप काही तरी करतोय असा आभास निर्माण करायचा आणि त्यावर जाहिराती करुन भोळ्याभाबड्या जनतेला फसवायचं आणि पुढे आपलं चालू ठेवायचं ही सरकारची व्याख्या माझी नाही. ही लोकशाही मानायला मी तयार नाही.’ असंही ते यावेळी म्हणाले.