औरंगाबाद : गेल्या २ महिन्यांपासून दुर्गंधी आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिवस ढकलणाऱ्या औरंगाबादकरांची उद्धव ठाकरेंनी माफी मागितली आहे. सध्या शिवसेना पक्षप्रमुख मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादला भेट दिली.


कचऱ्याची जबाबदारी कुणाची यात आपण पडणार नाही. मात्र दिलगिरी व्यक्त करत असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. यावेळी त्यांनी औरंगाबादेतील कंचराकोंडीवर दिलगिरी व्यक्त केली. मात्र या कचराकोंडीला एकटी शिवसेना नव्हे तर राज्य सरकारही  जबाबदार असल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपलाही टोला लगावला आहे.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून औंरगाबादेतील कचराकोंडी फुटली नसून शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.

VIDEO :