Sanjay Raut Latest News: नागपूरमध्ये (Nagpur News) सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा (Nagpur Winter Assembly Session) दुसरा आठवडा वादळी ठरणार आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी मुंबईतील (Navi Mumbai) सभेतून शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis) तसा सूचक इशारा दिला आहे. ठाकरे गटाची फौज आता नागपुरात दाखल होणार आहे.  उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर उद्या नागपुरात येणार आहेत. 'AU' प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray)  घेरल्यानंतर आता ठाकरे गटानेही शिंदे फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Govt) उत्तर देण्यासाठी रणनिती आखली आहे. संजय राऊतांनी उद्या नागपुरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिल्यामुळे उद्या नागपुरात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात


आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) समर्थनार्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत (Sanjay Raut), पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) नागपुरात येणार आहेत, गेल्या आठवड्यात दिशा सालियान मृत्यू प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारने आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता. 


नवी मुंबईत बोलताना राऊत काय म्हणाले...


संजय राऊत म्हणाले की, उद्या नागपूर येथे उध्दव ठाकरे आणि मी बरेच बॅाम्ब फोडणार आहोत.  आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही, आमची सेना लेचापेचा, पळपुट्यांची नाही.  धमक्या द्या , तडीपारी करा तरीही आमची सेना बुलंद आहे. फेब्रुवारीपर्यंत काहीही करून घ्या. नंतर तुम्ही नसणार. अली बाबा चाळीस चोर फेब्रुवारीनंतर नसणार, असंही ते म्हणाले. आम्ही बलिदान दिले. रक्त सांडले.तुम्ही काय केले टेंडर काढली, भूखंड खाल्ले, असा आरोप त्यांनी केला. 


ज्या कोठडीत मी होतो, त्यात तुम्हाला टाकणार- संजय राऊत


संजय राऊत म्हणाले की, 40 आमदार गेले असले तरी आता 140  आमदार निवडून आणून आपला मुख्यमंत्री बनवायचा आहे. ज्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना सोडायचे नाही.अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरून तुमची झोप उडवणार. तुमचे शंभर बाप आले तरी तुम्हाला सोडणार नाही. ज्या कोठडीत मी होतो. त्यात तुम्हाला टाकणार. तुमच्या फायली तयार आहेत. आमचे सरकार आल्यावर तुम्हाला दया मया नाही, तुम्ही मागून खंजीर खुपसला, आम्ही पुढून खुपसू, असा इशाराही संजय राऊतांनी दिला.