दुष्काळाबाबत निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्या : शरद पवार
एबीपी माझा वेब टीम | 18 Nov 2018 12:02 PM (IST)
पत्रासोबत दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळाबाबत निश्चित कृती कार्यक्रम हाती घेण्याची विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. वेळीच योग्या ती पावले उचलून दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा अशा आशयाचं पत्र पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहलंय. पत्रासोबत दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे. काहीच दिवसांपूर्वी राज्य सरकारनं राज्यातल्या 26 जिल्ह्यातल्या 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केलाय. राज्यात यंदा पाऊस कमी झाला आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पीकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यातच यंदा राज्यात दुष्काळाचे संकट आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यांच्या टंचाईमुळे पशुधनही धोक्यात आले आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यावर ठोस कृती कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. संबंधित बातम्या राज्यात 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर महाराष्ट्रातील कोणकोणत्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर? 151 तालुक्यांव्यतिरीक्त 250 मंडळात दुष्काळ जाहीर