मुंबई : मागील एक महिन्यांपासून रखडलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणखी लांबणीवर जाण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कारण अजून काही दिवस पोलिसांच्या बदल्या न करण्यासाठी पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल यांचे राज्य सरकारला पत्र दिल्याची माहिती मिळत आहे. तसच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडून येणाऱ्या शिफारसींमुळे ही पोलिस महासंचालक जयसवाल नाराज असल्याच कळतय. म्हणजे पुन्हा पोलिस अधिकऱ्यांच्या बदल्यांमुळे गृह मंत्री विरुद्ध पोलिस महासंचालक संघर्षांचा नवा अंका सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईमधील पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 48 तासात मध्येच रद्द करण्यात आल्या होत्या.


राज्यातील आयपीएस आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे मुदत 15 ऑगस्ट पर्यंत होती. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून गणेशोत्सवापर्यंत बदल्या नाही कराव्यात यावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी चौथ्यांदा मुदतवाढ घेण्याची परिस्थिती सरकारवर येऊ शकते.


तसेच जिल्ह्यातील एस पी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत पोलिस महासंचालकांनी आपल्या बदलीसाठी शिफारस करू नये तसेच लॉबिंग करू नये असे सुद्धा सूचना सुबोध जैस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, अनेक बडे पोलिस अधिकारी देखील आवडत्या पोस्टिंगसाठी लॉबिंग करत आहेत ज्यामुळे पोलिस महासंचालक नाराज असल्याच कळतय. या नाराजीमुळे गृहमंत्री विरुद्ध पोलिस महासंचालक असा संघर्ष भविष्यात पाहिला मिळणार का असा प्रश्न ही उपस्थित केली जातोय. एका पोलिस अधिकाऱ्यांनी एबीपी माझा ला माहिती दिली की ‘पोलिस महासंचालकांनी स्पष्ट केलं आहे की, शिफारस नव्हे तर रुल बुक प्रमाणेच बदल्या करणायत येतील. ज्या अधिकाऱ्यांचा कालावधी संपला आहे त्यांची बदली करण्यात येईल तर शासनाच्या आदेशनुसार नवीन नियुक्ती करण्यात येतील’


पोलिस दलात नेहमीच अधिकाऱ्यांकडून पोस्टींग साठी राजकीय दबाव किंवा शिफारस आणल्या जातात आणि त्यामुळे बदल्यांच या रेस नेहमी तोच अधिकारी बाजू मारतो ज्याला पोलिटिकल बैकिंग असत. काही दिवसांपूर्वी मुंबई उपआयुक्तांच्या बदल्या दोन दिवसातच रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामागचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील या बदल्यांना घेऊन आपसात चर्चा न झाल्याचं समोर आलं होतं. या बदल्या करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं. मात्र आता पोलिस महासंचालकांनी स्वत:च सप्टेंबर पर्यंत बदल्या न करण्याची विनंती करणारे पत्र राज्य सरकारला दिलं आहे. येणाऱ्या दिवसात अनेक सन आहेत आणि या सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर बदल्यामुळे तेथील पोलिस व्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो असे कारण पोलीस महासंचालकांकडून देण्यात आला आहे.


पोलिस महासंचालकांच नेमक मत काय आणि कसा परिणाम होऊ शकतो. येणारा दिवसांमध्ये गणेशोत्सव आणि इतर मोठे सण आहेत.सध्या कार्यरत असलेले अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरची वेवस्तीत माहिती आहे. त्या ठिकाणी जाणाऱ्या नवीन अधिकाऱ्याला ही माहिती नसेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या बदल्यात काही दिवसांसाठी स्थगित करण्याची मागणी पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी केली आहे. विरोधकांकडून मात्र यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत, भाजपचे आमदार राम कदम यांनी सरकारवर समन्वय नसल्याचा आरोप करत म्हणाले ‘सरकारचा आपसात जमत नाही आणि या नेत्यांना आपल्या मर्जीतील अधिकारी त्यांच्या जिल्ह्यात हवा आहेत म्हणून हा सगळा खेळ सुरू आहे.’


Police Transfer : गणेशोत्सवापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या नाहीत- DGP जायस्वाल