जालना : मराठा समाजाला ओबीसमधून सरसकट आरक्षण देऊ नयेत या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे सभा होत आहे. यावेळी, मनोज जरांगे यांनी बालहट्ट सोडा, आमच्या हातात कोयता आहे, असे म्हणत ओबीसी नेते आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.


तर, "राज्यातील सर्व वंजारी समाज कोयता घेऊन, छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या मागे आहे. त्यामुळे, जरांगे जास्त बोलू नका, आमच्या हातात कोयता आहे. लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे.  जरांगे नावच बाटूक आणि त्याच्या मागच्या लोकांना बघायचं आहे. त्यामुळे, भुजबळ यांच्या मागे ओबीसी समाज आहे," असं प्राध्यापक टी पी मुंडे म्हणाले आहेत. 


कोण काय म्हणाले...


माजी आमदार आशिष देशमुख यावेळी बोलतांना म्हणाले की, "बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनास्थळी सर्वात अगोदर देवेंद्र फडणवीस आले होते. ओबीसींना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की, सरसकटचे दाखले मराठा समाजाला देता येणार नाही. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे करत आहेत. त्यामुळे, मनोज जरांगे यांनी आपला बाल हट्ट सोडावा, असे देशमुख म्हणाले. 


बबनराव तायवाडे यावेळी बोलतांना म्हणाले की, "मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
मराठा आंदोलकांकडून सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यमागास वर्गाकडून अगोदरच ओबीसीमध्ये आहेत, त्यांचे सर्वेक्षण करू नयेत, असे म्हणाले. 


काँग्रेस आमदार राजेश राठोड यावेळी बोलतांना म्हणाले की, "राज्यातले सखार कारखाने भटक्या आणि विमुक्त लोकांच्या जीवावर सुरू  आहेत. ओबीसी नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात वक्तव्य थांबवायला हवेत. या पुढे ओबीसी नेत्यांच्या विरोधात बोलत असेल, तर मोठा भाऊ असलेल्या लोकांना छोट करायला वेळ लागणार नाही, असे आमदार राजेश राठोड म्हणाले.  


ओबीसी सभेच्या स्टेजवरील नेते...



  • मंत्री छगन भुजबळ 

  • विरोधी पक्षनेते वडेट्टीवार 

  • आमदार गोपीचंद पडळकर 

  • रासप प्रमुख महादेव जानकर

  • आमदार राजेश राठोड

  • मुस्लिम ओबीसी मोर्चाचे नेते शबीर अन्सारी

  • माजी आमदार आशिष देशमुख

  • माजी आमदार नारायणराव मुंढे

  • ओबीसी नेते प्रकाश शेंडगे

  • प्राध्यापक टी.पी. मुंडे 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalna OBC Sabha : जालन्यात ओबीसींचा महाएल्गार; भुजबळ, वडेट्टीवार, जानकर सभास्थळी, 'या' आहेत प्रमुख मागण्या