रायगड : रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांसाठी कर्जत आणि खोपोलीतील पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी असेल. पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी खोपोली आणि कर्जतमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. त्यामुळे पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेत कर्जतच्या उपविभागीय दंडाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. 5 जुलै 2018 ते 4 सप्टेंबर 2018 दरम्यान परिसरातील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असेल. तसंच धबधबे, धरण, नदी परिसरात पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे.