LIVE UPDATES | वणी तालुक्यातील डोरली गावाच्या नाल्याला आलेल्या पुरात 3 जण वाहून गेले

जगभरात कोरोना महामारीचा धोका वाढत चालला आहे. जगात 1.21 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगात एक कोटी 21 लाख 55 हजार कोरोनाबाधिता आहेत. तर कोरोनामुळं मृत्यूची संख्या 5 लाख 51 हजार वर गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 70 लाखांहून अधिक लोकं कोरोनामुक्त झाली आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 3,158,726 कोरोनाबाधित आहेत. अमेरिकेत 134,853 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. तर ब्राझिल दुसऱ्या नंबरवर असून 1,716,196 लोकं तिथं बाधित झाली आहेत. तर 68,055 लोकांचा मृत्यू झालाय. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 769,052 कोरोनाबाधित आढळले आहेत तर आतापर्यंत 21,144 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Jul 2020 09:02 PM
शिराळा तालुक्यातील शंभरी पार केलेल्या वृद्धाला 27 जून रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्‍यानंतर त्‍यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. दरम्‍यान, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यापूर्वी या रुग्णालयातील 94 वय असणाऱ्या एका वृद्ध महिलेनेही कोरोनावर मात केली होती. त्यानंतर या दुसऱ्या वृद्धाने कोरोनावर मात केली आहे. यामुळे योग्‍य उपचारातून कोरोनावर मात करता येते हे दिसून आले आहे. मिरजेच्या कोरोना रुग्णालयातून कोरोना बाधित आणि संशयित असणाऱ्या रुग्णांवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात सुमारे पंधरा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या या रुग्णालयात 80 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही मंत्री थेट वर्षा बंगल्यावर पोहचणार आहेत. तर काही ऑनलाइन सहभागी होणार आहेत. राज्यातील करोनाची स्थिती, लॉकडाउन या सगळ्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीत नेमका काय विषय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र लॉकडाउनबाबत काय निर्णय घ्यायचा? यावरची चर्चा कदाचित या बैठकीत होऊ शकते.
पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या कामास गती येणार. विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण होणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमयुटीपी-3 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या.
राज्यात आज 6875 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 230599 अशी झाली आहे. आज नवीन 4067 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 127259 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 93652 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
सोनी लिव्ह वरच्या सँडविच मधून अभिनेता कंवलजीत सिंह बाहेर. नव्या नियमानुसार 65 वर्षांवरील अभिनेत्यांना बंदी असल्याने 65 वर्षांच्या आतील कलाकाराला देण्यात संधी आली आहे.
ईडीकडून कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांची मुंबई मधील खार येथील 12 फ्लॅट्स, न्यूयॉर्कमधील एक फ्लॅट, लंडन मधील दोन फ्लॅट्स, ऑस्ट्रेलियातील मालमत्ता, पुणे आणि मुळशी भागातील शेत जमिनी, 5 अलिशान गाड्या, 344 बँक खाती असा सर्व मिळून 1411.9 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे
वणी तालुक्यातील डोरली गावाच्या नाल्याला आलेल्या पुरात 3 जण वाहून गेले. एक महिलेचा मृतदेह सापडला असून 2 पुरुषांना शोध सध्या सुरू आहे.
हिंगोली तालुक्यातील बोरजा येथे आज सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास दोन बहिणीचे एकाच मंडपात लग्न लागले. दोन्ही ताईच्या लग्नाला जायचं हाय म्हणत तब्बल 600 पेक्षा अधिक वऱ्हाडी मंडळी पोहोचली. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लग्नासाठी 50 लोकांची परवानगी असताना एवढी मोठी जत्रा भरण्यात आली असल्याची कुणकुण प्रशासनाला लागली आणि काही वेळातच प्रशासनाचे कर्मचारी लग्न घरी दाखल झाले आणि मग वऱ्हाडी मंडळींची चांगलीच पळापळ झाली. फिजिकल डिस्टन्स, मास्क वापरण्याच्या सक्तीचे तीन-तेरा वाजल्याचे दिसून आले. सध्या या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून चौकशीअंती 500 च्या वर वऱ्हाडी मंडळीवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अंबी गावात पोलीस पथकावर हल्ला झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हे गाव परंडा तालुक्यातले एक मोठे गाव आहे. आज सकाळी गावातल्या दुकानासमोरची गर्दी हटवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दलातील इतर पोलीस गेले होते. पोलीस गाडीवर ही दगडफेक करण्यात आली. या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी झाले आहेत. या घटनेच्या व्हिडिओ मध्ये मात्र दुकानदार आपल्या वडिलांना मारहाण का केली असं पोलिसांना विचारताना दिसतोय. घटनेनंतर शासकीय कामात अडथळा आणल्याच आंबी मधील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. एक जणाला अटक केली तर पाच जण फरार आहेत. फरार व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.
'महाबीज'च्या अकोल्यातील मुख्य कार्यालयावर युवक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन. बोगस सोयाबीन विरोधात काँग्रेसचं आंदोलन. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा समावेश. मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयात ठिय्या.
अकोल्यात दोन लाखांच्या लाच प्रकरणात जिल्हा उपनिबंधक डाॅ. प्रविण लोखंडाला अटक करण्यात आली. या लाच प्रकरणात दलाल म्हणून काम करणारा सहायक विक्रीकर आयुक्त अमर शेट्टीलाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्यात. उपनिबंधक डाॅ. लोखंडेनं अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी दहा लाखांच्या लाचेची मागणी केली होत आहे. बोलणीतून डाॅ. लोखंडे यांनी लाचेची ही रक्कम पाच लाखांवर आणली होती. त्यातील दोन लाखांचा पहिला हफ्ता देतांना दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकाचवेळी वर्ग एकच्या दोन अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. 2018 मध्ये एका लाच प्रकरणात डाॅ. लोखंडे हे चर्चेत आले होते.
संजय निरुपम यांच्या आरोपाकडे लक्ष देण्याची गरज नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय आहेत याची माहिती सर्व महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे याकडे लक्ष न देलेलं बरं : शिवसेना
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह निवास्थानावर अज्ञातानी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरातून आंबेडकर अनुयायीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. हल्लेखोरांनी राजगृह परिसरातील वस्तूंची तोडफोड केली आहे. अनुयायांकडून घटनेचा निषेध करत हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे. आज घाटकोपर क्राईम ब्रांच कार्यालय नजदिक असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारा जवळ अनुयायीनी हल्लेखोर आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी केली. कोरोनाचा संसर्ग असल्याने आम्ही शांत आहोत प्रशासनाने आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई करावी अन्यथा आमच्या रागाचा उद्रेक होईल अश्या भावना या वेळी आंदोलकांनी व्यक्त केल्या.
बैठकीत चांगली चर्चा झाली, प्रत्येकाने आपलं म्हणणं मांडलं, आज काहीतरी चांगला निर्णय होईल, विनायक मेटे यांची माहिती
सारथी संदर्भातील आजच्या बैठकीत गोंधळ, संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत बसवल्याने मराठा समाज समन्वयकांची नाराजी, अजित पवार यांच्याकडून मध्यस्थीचा प्रयत्न

आजच्या आज सारथीसाठी निधीची घोषणा करा, सारथी संस्थेला सरकारनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे, विनोद पाटील यांची प्रतिक्रिया, संभाजीराजे छत्रपती यांनी समाजाचा प्रतिनिधी म्हणून आल्याचं सांगितलं असल्याचंही पाटील यांची माहिती
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील आठ पोलिसांचं हत्या प्रकरण : कुख्यात गुंड विकास दुबे अखेर अटकेत, उज्जेनमधून विकास दुबे पोलिसांच्या ताब्यात
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ , यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 101 तर ग्रामीण भागातील 65 रुग्णांचा समावेश , त्यामध्ये 90 पुरूष तर 76 महिलांचा समावेश, आतापर्यंत एकूण 7504 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 4033 रुग्ण बरे झाले, 330 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू, 3141 जणांवर उपचार सुरू
कर्नाटकात दहावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. तर 80 विद्यार्थ्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.
औरंगाबाद 10 ते 18 जुलैदरम्यानच्या लॉकडाऊनला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान, शहरातील लोकविकास परिषदेच्या वतीने खंडपीठात याचिका,
संबंधित याचिका ऑनलाईन दाखल, आज सुनावणी, मार्चपासून लॉकडाऊन घेण्यात येत असल्याने अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. छोट्या छोट्या
व्यवसायिकांना मोठा फटका यामुळे बसत असून उपजिविका कशी करणार याबाबत याचिका
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजता पंचगंगा नदीची पातळी 26 फूट 7 इंचावर पोहोचली. जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे.
जगभरात कोरोना महामारीचा धोका वाढत चालला आहे. जगात 1.21 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगात एक कोटी 21 लाख 55 हजार कोरोनाबाधिता आहेत. तर कोरोनामुळं मृत्यूची संख्या 5 लाख 51 हजार वर गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 70 लाखांहून अधिक लोकं कोरोनामुक्त झाली आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 3,158,726 कोरोनाबाधित आहेत. अमेरिकेत 134,853 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. तर ब्राझिल दुसऱ्या नंबरवर असून 1,716,196 लोकं तिथं बाधित झाली आहेत. तर 68,055 लोकांचा मृत्यू झालाय. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 769,052 कोरोनाबाधित आढळले आहेत तर आतापर्यंत 21,144 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 333 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक शहर 235, ग्रामीण 90 तर मालेगावात 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्येने सहा हजारांचा टप्पा पार केला असून एकूण 6037 कोरोनाग्रस्त आहेत. जिल्ह्यात आज कोरोनाचे 5 बळी गेले असून मृत्यूचा आकडा 298 वर पोहोचला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 3511 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2228 बाधितांवर उपचार सुरु आहेत.
नागपुरातील एका पोलीस शिपायाला लुटमारीच्या प्रकरणात मध्यप्रदेशात अटक झाली आहे. दीपक निमोणे नावाच्या या पोलीस शिपायाने सुट्टीच्या दिवशी मध्यप्रदेशात जाऊन 54 हजारांची लूटमार केली होती. मध्यप्रदेश पोलिसांनी त्याला चार सहकाऱ्यांसह अटक केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांवर आपल्या शिपायाला निलंबित करण्याची नामुष्की ओढवली आहे.    
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एशिया कप स्पर्धा 2020 रद्द; बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांची घोषणा.
Live Update | जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, नशिराबाद जवळील घटना, प्रवीण दरेकर यांना किरकोळ दुखापत, पाऊस आणि अंधार यामुळे ताफ्यातील मागील गाडीचा धक्का लागल्याने अपघात
शासकीय व्यवहारासाठी खाजगी बँकांना हद्दपार केल्यानंतर आता जिल्हा बँकांना सरकारची दारं उघडी, राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच खाजगी बँकेतून धसकीय व्यवहार रद्द करण्याचा घेतला होता निर्णय. यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून पत्नी अमृता फडणवीस कार्यरत असलेल्या खाजगी बँकेत शासकीय विभागाचे खाती वळवल्याचा झाला होता आरोप. मात्र, आता आयडीबीआय, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. विशेष म्हणजे शासकीय व्यवव्हार करण्यास 15 जिल्हा मध्यवर्ती बँकांना मान्यता देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हा बँकांचा समावेश. जिल्हा बँकेत सार्वजनिक उपक्रम / महामंडळं यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी मान्यता दिली. राजकीय पुढाऱ्यांचं वर्चस्व असललेल्या जिल्हा बँकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.
मालेगावमध्ये सुरुवातीला कोरोना टेस्ट झाल्या नाहीत. त्यामुळे हे मृत्यू कोरोनाचे मृत्यू दाखवले नाहीत. मृत्यू बाबत विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी मिशन ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत 15 जुलै 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. या कालावधीत पूर्वीच्या लागू असलेल्या निर्बंधांना 15 जुलै 2020 पर्यंत कायम ठेवण्यात आले आहे.
राजगृहाला कायमस्वरूपी पोलीसांचा बंदोबंस्त असणार, मंत्रिमंडळात सर्वांनी मागणी केली ती मागणी तातडीनं मंजूर झाली. 24 तास 365 दिवस पोलीस बंदोबस्त असणार : जितेंद्र आव्हाड
रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात 273 नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'ला कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त असणार, मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांनी मागणी केली ती मागणी तातडीनं मंजूर झाली, जितेंद्र आव्हाड यांची माहिती
बारामती तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी गेला असून जळोची येथील 54 वर्षीय नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा कोरोनाचा तालुक्यातील चौथा बळी आहे. या रुग्णावर बारामती रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु होते.
सोलापूर : कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी काढलेल्या आदेशाचा भंग केले प्रकरणी 2 दिवसात पोलिसांनी जिल्ह्यात तब्बल साडे दहा लाख रुपयांचा दंड केला वसूल
कॉलेज शाळा बंद असल्यामुळे सीबीएसईने इयत्ता 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी करून त्यांचा ताण कमी केला आहे. मात्र, सीबीएसई ने कमी केलेल्या अभ्यासक्रमात इयत्ता 11 वी मध्ये शिकवल्या जाणाऱ्या नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद या सारख्या महत्वाचे विषय पूर्णपणे कमी करण्यात आले आहेत. सीबीएसईने परिपत्रकार महत्वाचे धडे तसेच ठेवून इतर अभ्यासक्रम वगळणार असल्याच सांगितलं होतं. मात्र, हे धडे कमी केल्यानंतर हे धडे महत्वाचे नाहीत का ? हा प्रश्न उपस्थित केला जातोय.
विविध संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या निर्णयाला शेकाप आमदार जयंत पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांना हा शासन आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. कोरोना महामारीच्या पार्शवभूमीवर उपाय योजनेत सातत्य राखणे, तसेच तालुका स्तरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्थानिक परिस्थितीची जाण असल्याने आता बदल्या केल्या तर प्रशासनावर ताण येऊ शकतो अशी, चिंता जयंत पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. त्याचसोबत कोकणात चक्रीवादळानंतर सुरू असलेल्या पंचनाम्याची कामं अपूर्ण असून नवी अधिकारी आल्याने पुन्हा श्री गणेशा करावा लागेल आणि मदत पोहचण्यात विलंब होईल असंही त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई व कोंकण या विभागीय मंडळांतर्फे काढलेल्या विविध सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी 15 डिसेंबर 2020 पर्यंत बिनव्याजी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सोडतीतील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा विहित वेळेत करता आलेला नाही. सदर यशस्वी व पात्र लाभार्थ्यांकडून विक्री किंमत भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर यावर उपाययोजना म्हणून 'म्हाडा'तर्फे दिलासा देणारा सदर निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई मंडळातर्फे काढण्यात आलेल्या सर्वसाधारण सदनिका सोडत व गिरणी कामगार सदनिका सोडतीमधील सुमारे 700 यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे.
कोंकण मंडळातर्फे सन 2014, 2016, 2018 मध्ये काढण्यात आलेल्या सदनिका सोडतींमधील सुमारे 1000 यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा मिळणार आहे. कोकण मंडळातर्फे सोडतीतील पात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या देकार पत्राची मुदत दि. 15 मार्च, 2020 पर्यंतच होती.
म्हाडाने घेतलेल्या या निर्णयाबाबतची माहिती संबंधित बँकेलाही देण्यात आली असून याची कृपया मुंबई व कोकण मंडळाच्या सोडतीतील संबंधित पात्र व यशस्वी लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन 'म्हाडा'तर्फे करण्यात आले आहे
पारनेरचे राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे. सर्व पाच नगरसेवक मुंबईत असून 'मातोश्री'वर जाऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
कोल्हापूर - कॉ गोविंद पानसरे हत्या प्रकरण,

दोन आरोपींचे जामीन अर्ज दाखल होणार ,

भरत कुरणे आणि सचिन अंदुरे यांचे जामीन अर्ज,

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज होणार सुनावणी,

पानसरे हत्या प्रकरणात दोघेही संशयित आरोपी,

कोल्हापूर न्यायालय जामीन मंजूर करणार का ?,

सध्या सचिन अंदुरे औरंगाबाद मधील कारागृहात,

भरत कुरणे बंगलोरमधील कारागृहात
चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यात जाणारा मार्ग बंद केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर ही घटना घडली. 2 जुलैपासून चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करण्यापासून सरसकट बंदी घालण्यात आली आहे. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती या गडचिरोली जिल्ह्यातील वडसा आणि आरमोरी तालुक्यात आहेत. ऐन हंगामात शेतात जाता येत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या राजगृहाच्या बागेची नासधूस केल्याच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत, असं ट्वीट मुख्यमंत्री कार्यालयाने केलं आहे.


तळकोकणात गेले काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ह जिल्ह्यातील 13 लघु पाटबंधारे 100 टक्के भरले तर 1 मध्यम प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहे. सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण आज ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे पालिकेच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष यांनी आपल्या सहका-यासमवेत त्याठिकाणी जाऊन जलपूजन केले. १८ मीटरची खोल आलेला हे धरण अनेक वर्षांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरलं. जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्यातील नद्यांना पूरसदृश स्थिती निरमा झाली आहे. अनेक ठिकाणी सकाळ भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेले 'ऑपरेशन ब्रेक द चेन' अभियान आज (8 जुलै) संपल्यावरही कशेडी घाटातून विनापरवाना प्रवासी वाहतुकीला परवानगी असणार नाही, अशी माहिती खेडचे उपविभागीय अधिकारी अविषकुमार सोनोने यांनी सोमवारी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी 1 ते 8 जुलै या कालावधीत 'ऑपरेशन ब्रेक द चेन' हे अभियान लोक सहभाग घेऊन राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्याच्या सीमा देखील ये-जा करण्यासाठी बंद करण्यात आल्या आहेत.
आंतरजिल्हा वाहतूक अद्यापही बंधनमुक्त केलेली नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्यांनी पास घेऊनच यावे अन्यथा कशेडी येथील तपासणी नाक्यावर प्रवेश मिळणार नाही. कशेडी येथून परवानगी नसल्यास आपल्याला परत जावे लागू शकते, याची नोंद घ्यावी असे सोनोने यांनी सांगितले.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. शिवाय, डॉक्टर्स असतील किंवा पोलीस यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. त्यानंतर आता कोरोना वॉर्डमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधितांशी थेट संपर्क साधण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील माने इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल अॅपद्वारे नियंत्रित करता येणारी रोबो अर्थात ट्रॉली तयार केली आहे. याकरता विद्यार्थ्यांना जवळपास दीड महिन्यांना कालावधी लागला. शिवाय, शिक्षकांनी त्यांना या कामा मदत केली. महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास 60 किलो वजन ही ट्रॉली वाहू शकणार आहे. या ट्रॉलीला कॅमेरा असून माईकच्या सिस्टममुळे डॉक्टर रुग्णांशी 30 मीटरवरुन संवाद साधू शकणार आहेत. केवळ 25 हजारांचा खर्च या रोबोरुपी ट्रॉली तयार करण्यासाठी आला आहे.
भारत-चीन सीमेवरच्या वादानंतर राजीव गांधी फाउंडेशनला 2005-06 दरम्यान चीन कडून झालेल्या फंडिंग बाबतचे प्रश्न भाजपने उपस्थित केले होते,

आता त्यासंदर्भात गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी गृहमंत्रालयाची समिती,

राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट, या सर्व संस्थांच्या कारभाराची चौकशी,

ED स्पेशल डायरेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी
भारत-चीन सीमेवरच्या वादानंतर राजीव गांधी फाउंडेशनला 2005-06 दरम्यान चीन कडून झालेल्या फंडिंग बाबतचे प्रश्न भाजपने उपस्थित केले होते,

आता त्यासंदर्भात गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी गृहमंत्रालयाची समिती,

राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट, या सर्व संस्थांच्या कारभाराची चौकशी,

ED स्पेशल डायरेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार पार,

गेल्या चोवीस तासांत नवे 45 रुग्ण आढळले ,

जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात सर्वाधिक रुग्ण ,

इचलकरंजी आणि चंदगडमध्येही रुग्णांच्या संख्येत वाढ
मनमाड शहरात करोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी व्यापारी महासंघाने पुढाकार घेत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू आजपासून पुकारला आहे. शहरात आतापर्यंत 86 जण कोरोनाबाधित झाले असून त्यातील 52  जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर शहरातील चार आणि बाहेरगावचे दोन अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला असला तरी ज्यांना दुकान उघडी ठेवायची त्यांनी दुकान उघडी ठेवावी, असा पर्याय व्यापाऱ्यांपुढे ठेवला असला तरी बाजार पेठेतील अनेक दुकांन बंद असल्याचं पाहावयास मिळाले. मेडिकल, दवाखाने, दूध डेअरी यांना मात्र यातून वगळण्यात आलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम,

शहरात रिमझिम तर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस,

सकाळी 8 वाजता पंचगंगा नदीची पातळी 21 फूट 5 इंचावर पोहचली,

जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली, पर्यायी मार्गाने वाहतूक
,
पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 67 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 92 पुरूष तर 74 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7300 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3824 रुग्ण बरे झालेले असून 327 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने 3149 जणांवर उपचार सुरू
लातूर जिल्ह्यातील भाजपाचे एक आमदार आणि त्यांचा 16 वर्षांचा मुलगा, 10 वर्षांचा भाचा कोरोनाबाधित, आमदार जिल्हाअंतर्गत फिरत होते, काल रात्री आला अहवाल, सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
लातूर जिल्ह्यातील भाजपाचे एक आमदार आणि त्यांचा 16 वर्षांचा मुलगा, 10 वर्षांचा भाचा कोरोनाबाधित, आमदार जिल्हाअंतर्गत फिरत होते, काल रात्री आला अहवाल, सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
औरंगाबादमधील शिवसेना नगरसेवक रावसाहेब आमले यांचा कोरोनामुळे मृत्यू, मिटमिटा भागाचे नगरसेवक आमले यांच्यावर सुरु होते खासगी रुग्णालयात उपचार, गेल्या दोन दिवसात शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा मृत्यू
नाशिकमधील भद्रकाली स्टॅण्ड परिसरात जुना वाडा कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकून एकाचा मृत्यू झाला तर दोन जखमी झाले आहेत. राजन बोरसे असं मृत तरुणाचं नाव असून तो वाड्यातील भाडेकरुन होत. जखमींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नाशिकमध्ये रात्रीपासून पाऊस सुरु आहे. पावसामुळे वाड्याचा काही भाग खचला आणि आज पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाने अर्ध्या तासाच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ढिगाऱ्याखालून एक मृतदेह आणि दोन जखमींना बाहेर काढलं. जखमींमध्ये एक मालक असून दुसरा भाडेकरु आहे. वाड्यात मालक आणि दोन भाडेकरु राहत होते

राज्यातील दुकाने आणि मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील, ९ जुलैपासून ही संमती देण्यात येत आहे. आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील, मिशन बिगिन अगेन टप्पा ५ अंतर्गत आज यासंदर्भातील आदेश , मुंबई महानगर क्षेत्रातील दुकांनाना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती, आता दुकानांवर होणारी गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत
LIVE UPDATE | जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात गुन्हा, भाच्याला जीवे मारण्याची धमकी आणि बदनामी केल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशांनुसार गुन्हा दाखल, कुचे यांच्या भावासह तिघांवर चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हॉटेल्स उद्या सुरू होणार नाहीत,
राज्य सरकारने हॉटेल आणि परमीट रूम सुरू करण्यास परवानगी दिली आहे, मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्ये वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता या दोन्ही शहरांमध्ये हॉटेल्स येत्या दोन दिवसांमध्ये तरी सुरू न करण्याचा निर्णय दोन्ही महापालिका आयुक्तांनी घेतलाय. परिस्थिती पाहून शुक्रवारी पुन्हा हॉटेल्स सुरू करण्याचा विचार होऊ शकतो.
क्वॉरंटाईन सेंटरमध्ये असलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील संशयित कोरोनाबाधितांची डिस्चार्ज पूर्वी कोरोना चाचणी होणार, बीएमसी आयुक्त इकबाल चहल यांचा निर्णय, क्वॉरंटाईन सेंटरमधील लोकांचा 14 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर कोरोना चाचणी न करताच घरी पाठवले जात होते, मात्र आता कोरोना चाचणी केल्यानंतरच त्यांना घरी सोडले जाणार आहे
औरंगाबाद विभागात बोगस बियाणे प्रकरण, बोगस बियाणांच्या विक्रीमुळे सोयाबीन पिकाची उगवण न झाल्याप्रकरणात औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी १३ जुलै सकाळी साडेदहा वाजता उच्च न्यायालयात खंडपीठात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आणि ते हजर न झाल्यास त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश, डॉ. जाधव यांनी दाखल केलेल्या माहितीतून दोषी कंपन्या आणि विक्रेत्यांना वाचवून सर्व दोष शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचे दिसत असल्याचे स्पष्ट करीत खंडपीठाने त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले. आजच्या सुनावणीत शासनातर्फे अशा प्रकारच्या २३ तक्रारी दाखल झाल्याचे तसेच तक्रारी प्राप्त झालेल्या कंपन्यांना कारणेदर्शक नोटीस बजावण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला 28 दिवसांचा फरलो मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फरलो मंजूर केला, काही दिवसांपूर्वीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करून नागपूर कारागृहात परतला आहे
Corona Update | राज्यात आज 5134 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, आज 3296 रुग्ण कोरोनामुक्त, तर आज 224 रुग्णांचा मृत्यू, सध्या एकूण 89294 रुग्णांवर उपचार सुरु
LIVE UPDATE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात महत्वाची बैठक सुरू, या बैठकीत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि परविहन मंत्री अनिल परब देखील उपस्थित
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता सीबीएसीई बोर्डाने इयत्ता नववी ते बारावी अभ्यासक्रम 30 टक्के कमी करण्याचा निर्णय.अभ्यासक्रमातील महत्वाच्या कन्स्पेट सोडून इतर 30 टक्के अभ्यासक्रम NCERT च्या मदत घेऊन कमी केला, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती
बारामती शहरात विना मास्क फिरणाऱ्या 112 लोकांवर कारवाई करण्यात आलीय.. याबरोबरच विनाकारण फिरणाऱ्या तिघांवर आणि वेळेत दुकाने दुकाने बंद न करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे..
नांदेड : आज दोन कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला असून नव्याने 16 रुग्ण आढळून आले. एकूण रुग्णसंख्या 458 वर पोहोचली आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 101 वर पोहोचली असून बळींची संख्या 22 वर पोहोचली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण थेट देहूरोड पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन बसले होते. कोणतेही रुग्णालय उपचारासाठी दाखल करून घेत नसल्याने त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. देहूरोड कन्टेन्मेट बोर्डला पोलिसांनी याबाबत विचारलं असता त्यांनी असमर्थता दर्शवली. शासकीय एक रुग्णालय भरती करून घेत नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. शेवटी पोलिसांनी पीपीई किट उपलब्ध करून दिले आणि नंतर कन्टेन्मेट रुग्णालयात नेहून सोडले.
सांगली मार्केट यार्डात उद्यापासून हळद, गुळ, बेदाणा सौदे बंद राहणार आहेत. सांगली शहरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने निर्णय घेतला आहे. तर धान्य मार्केट गुरुवारपासून बंद राहणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एका रुग्णाचा कोरोनामुळे बळी गेला आहे. इचलकरंजीतील 75 वर्षीय वृध्येचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत इचलकरंजीत कोरोनाचे पाच बळी गेले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 15 वर पोहचली आहे.
सोलापुरातील ग्रामीण भागात 30 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील 587 जण कोरोना बाधित आहेत. तर त्यापैकी 27 जणांनी जीव गमावला आहे. आज दिवसभरात 18 रुग्णांना डिस्चार्ज तर आतापर्यंत 241 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. उर्वरित 319 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शिर्डीच्या साईबाबांना गुरुपोर्णिमेनिमित्त आलेल्या दानात कमालीची घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत साईबाबा संस्थानला 3 कोटी 72 लाखांचा फटका बसला आहे. कोरोनाच्या सावटात भक्तांविना साजऱ्या झालेल्या तीन दिवसीय गुरूपोर्णिमा उत्सवात साई संस्थानला 79 लाखांचे दान प्राप्त झालं आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून 67 लाख 67 हजार तर तर डेबिट , क्रेडीट, चेक, डी.डी आणि मनिऑर्डरद्वारे 10 लाख 63 हजार रुपये तर देणगी काउंटरवर 01 लाख 18 हजार रुपये भाविकांनी दानाच्या स्वरुपात दिले आहे.
मिरा भाईंदर शहरविसियांना आता सार्वजनिक स्थली थुंकल्यास, मास्क न लावल्यास तसेच सोशल डिस्टनसिंग न ठेवल्यास आता दंड भरावा लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असताना आयुक्तांनी कोरोनाची रोखथांब करण्यासाठी कडक नियमावली लागू केली आहे. मिरा भाईंदर शहरात 10 तारखेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यात आता आयुक्तांनी पत्रक काढून, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता दंडात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. आता सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न घातल्यास 500 रुपये दंड, तर सार्वजनिक स्थळी थुंकल्यास हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर दुकानासमोर ग्राहकांनी सोशल डिस्टनसिंग न राखल्यास मार्किंग न केल्यास, दुकानदारांना दोन हजाराचा दंड तर ग्राहकांकडूनही दोनशे रुपयाचा दंड आकारणार आहे. तर दुसऱ्या वेळी आढळल्यास दंडाची रक्कम दुप्पट होईल. तसेच फौजदारी कारवाई अथवा दोन्ही होवू शकेल. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने आता कडक पावलं उचळली आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईतील संशोधकांनी नॅनो कोटींग तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे कोणत्याही पृष्ठभागाकर, वस्तूवर नॅनो कोटिंग केल्यास तीन महिन्यापर्यंत कोटिंग केलेला पृष्ठभाग हा कोरोना वायरस आणि इतर बॅक्टेरियाला नष्ट करतो आणि कोरोनापासून बचाव करू शकतो.
या प्रकारच्या नॅनो कोटींगचा वापर कार्यालय, रुग्णालय, मॉल्स यासारख्या सार्वजनिक ठिकाणी तर करूच शकतो शिवाय आपल्या घरी पेंट ज्याप्रकारे करतो त्याच पद्धतीने घरी सुद्धा हे कोटिंग केलं जाऊ शकतं.
मराठा आरक्षणासंदर्भातील आजची सुनावणी संपली, 15 जुलै रोजी अंतरिम आदेशाबाबत सुनावणी होणार
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून 1100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर पंचगंगा नदीवरील राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी आदी नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
दत्ता साने यांच्या कुंटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माजी आमदार विलास लांडे यांचीही भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी विलास लांडे यांच्या वडिलांचं निधन झालं होतं.त्यानंतर शरद पवारांची सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत पाच वाजता पुण्यात बैठक होणार आहे.
दत्ता साने यांच्या कुंटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माजी आमदार विलास लांडे यांचीही भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी विलास लांडे यांच्या वडिलांचं निधन झालं होतं.त्यानंतर शरद पवारांची सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत पाच वाजता पुण्यात बैठक होणार आहे.
कोरोनामुळे निधन झालेले नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पोहोचले. कोरोनाशी मुकाबला करताना शनिवारी पहाटे दत्ता साने यांनी अखेरचा श्वास घेतला. 24 जूनला साने यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यांच्यावर आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु होते. शेवटच्या चार दिवसांत त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला आणि अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे सांत्वन करण्यासाठी आज स्वतः शरद पवार आले होते.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज ऑनलाईन सुनावणी होणार आहे. ही सुनावणी ऐकण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. कोल्हापूरमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल. एकोणिसाव्या नंबरला सुनावणी होणार आहे.
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्वाचा दिवस आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांवर सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेतं या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. मागच्या वेळी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला नकार दिला होता. पण सोबतच हा अंतरिम निर्णय असून याचं भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून असेल असं सांगितलं होतं.
विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी, केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पत्राद्वारे दिली परवानगी, विद्यापीठांच्या परीक्षा यूजीसी मार्गदर्शक सूचनांनुसार आणि विद्यापीठांच्या शैक्षणिक वर्षानुसार होणारच
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्वाचा दिवस आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांवर सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेतं या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. मागच्या वेळी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला नकार दिला होता. पण सोबतच हा अंतरिम निर्णय असून याचं भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून असेल असं सांगितलं होतं.
राज्यात आज 5368 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, आज 3522 रुग्ण कोरोनामुक्त, तर 204 रुग्णांचा मृत्यू, 87 हजार 681 रुग्णांवर उपचार सुरु
रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात 264 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर आज दिवसभरात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पनवेलमध्ये 144, उरण 14 , खालापूर 22, पेण 12, अलिबाग 44, माणगाव 7, महाड 10, रोहा 7 रुग्णांचा समावेश आहे.
अमरावतीत आज 5 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अमरावतीतील कोरोनाबाधितांची संख्या 700 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 462 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 211 जण सध्या उपचार घेत आहेत.
मनमाड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने, रुग्णांची साखळी तोडण्यासाठी व्यापारी महासंघाने बुधवार दिनांक 8 ते 12 जुलै या पाच दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवसांत मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बुलडाण्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तर आज कोविड रुग्णालयातून 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 300 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या 13 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 190 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या कोविड रुग्णालयात 97 जणांवर उपचार सुरु आहेत.
वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. कोरोनाने आज 6400 चा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 283 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. आज 3 कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे तर 483 जणांनी कोरोनावर मात केली आहे. नवे 283 रुग्ण पकडून वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण संख्या 6453 झाली आहे. वसई विरार क्षेत्रात कोरोना बाधित मृत्यूची संख्या 129 झाली असून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 3293 झाली आहे. उर्वरित 3031 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
हिंगोली : पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांचे पॅकेज केंद्र सरकारने काही महिन्यापूर्वी लागू केले आहे. यामध्ये इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती, सरकारी नोकरदार, पाच एकरच्या वर शेती असणारी व्यक्ती, भूमीहीन व्यक्ती, अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. परंतु या योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी डावलून अपात्र व्यक्तींचा यादीमध्ये समावेश असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्याचबरोबर शेतकरी वर्गातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी देखील प्राप्त होताना दिसत आहेत.
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील 5 शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. मात्र राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावे असा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना पाठवला. मात्र हा विषय राजकारणाचा नसून केवळ संख्याबळ जागेवर ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे. इतकेच नाही तर अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे सर्व मिळून 1 समुद्र असून कुठल्याही नदीने पाणी गेले तरी समुद्रातच मिळणार असल्याने यात शंका कुशंका काढू नये अशी विनंती देखील निलेश लंके यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर संभाजी राजे यांची प्रतिक्रिया

पुणे : कोंढव्यात 60 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णांची कोविड केअर सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, सिंहगड इन्स्टिट्यूटमधील घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रकार उघडकीस आला, गुंडाप्पा शेवरे (वय 60) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव
धुळे शहरातील बारा पत्थर चौकात असलेल्या बाफना संकुलातील एका मोबाईलच्या दुकानातून अवघ्या दोन मिनिटांत चोरट्यांनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शटर उचकवून जुने-नवे असे मिळून एकूण 10 ते 12 लाखाचे मोबाईल लांबवले आहेत. चार ते पाच चोरट्यांनी ही चोरी केल्याची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एरवी वर्दळ असलेल्या बारा पत्थर चौकात सकाळी 6 वाजता घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.
पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा. असा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दिला आहे. परंतु, हा निरोप

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोन करून अजित दादांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पारनेर नागरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंना फार रुचलेले दिसत नाहीत.

त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेने फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित दादांना दिल्याचं समजतयं.
ढाब्यावर थांबलेल्या ट्रकमधून 40 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. मुंबई -आग्रा महामार्गावरील धुळे शहराजवळील रोकडोबा जवळ असलेल्या एका ढाब्यावर धुळ्याकडून मालेगावकडे जात असलेल्या ट्रकमध्ये महाष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून मुद्देमालासह ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे.
8 जुलैपासून हॉटेल्स - लॉज उघडणार, पण रेस्टॉरंट नाही, महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा ; हॉटेल्स लॉज आणि गेस्ट हाऊसला फक्त 33% क्षमतेसह परवानगी, रेस्टॉरंटला परवानगी नाही
ठाण्यातील ग्लोबल इम्पॅक्ट हबमध्ये सुरु केलेल्या covid-19च्या हॉस्पिटलमधून एक रुग्ण गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 29 जूनला या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना बाळकुम येथील ग्लोबल इम्पॅक्ट या covid-19 च्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून रुग्णा संदर्भात काहीही माहिती उपलब्ध न झाल्याने शेवटी आज रुग्णाच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन विचारणा केली. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने संपूर्ण हॉस्पिटल पालथे घातले. मात्र हा रुग्ण कुठे सापडला नाही. हा रुग्ण 71 वर्षांचा असून त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने स्वतःहून चालता येत नाही. अशा परिस्थितीत रुग्ण गायब कसा होऊ शकतो असा सवाल रुग्णाच्या नातेवाईकांनी विचारला आहे. आज ठाणे महानगरपालिकेच्या दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या हॉस्पिटलला भेट दिली. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी यासंदर्भात घडलेला प्रकार त्यांना सांगितला. या प्रकारणा संदर्भात लवकरात लवकर शोधकार्य करून कारवाई करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या आहेत.
पुणे : कोरोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला बावधन जवळ अपघात, कोरोना रुग्णांना घेऊन ही ॲम्ब्युलन्स बालेवाडी भागातील निकमार या क्वॉरंटाईन सेंटरकडे निघाली असताना झाला अपघात, ॲम्ब्युलन्समधील रुग्ण जखमी झाल्याची माहिती
वाशीम जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकाने आजपासून आपले व्यापार प्रतिष्ठान बे मुदत बंदच्या आंदोलनाचा पावित्रा हाती घेतला आहे. गेल्या महिन्याभरापासून विक्री केले गेलेलं सोयाबीनच बियाणे न उगवल्याने शेतकऱ्याकडून कृषी केंद्र चालकांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार केला जात आहे. तर अनेकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. तर बियाणे प्रमाणित करून दिलेल्या कंपन्याचच बियाणे कृषी केंद्र चालक विक्री करत आहेत. त्यामध्ये विक्रेत्याचा दोष नसतांना नाहक त्रास दिला जात असल्याने आंदोलनाच हत्यार उपसले असून त्यासंदर्भात जिल्हा कृषी अधिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
मिशन बिगेन अगेन अंतर्गत सध्या विविध व्यवसाय सुरु करण्यासाठी 5 जून पासून सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत बाजार, डोमेस्टिक फ्लाईट, छोटे छोटे व्यवसायिक, सलून व्यवसाय यांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरच विविध निर्बंध लावून हॉटेल व्यवसाय देखील सुरु करण्याचा शासन विचार करत आहे. या पार्श्वभूमीवर जिम व्यवसायायिकांनी देखील आमच्या व्यवसायाला सुरु करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी केली आहे. या मागण्यांचे पत्र देखील याआधी जिम व्यवसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. सध्या जिम व्यवसायिकांचे चार महिन्याचे भाडे, कर्जाचे हफ्ते, लाईट बील थकलेलं आहे.
संपूर्ण दौंड शहर बंद ठेवण्यात आले आहे. सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने उघडली जाणार आहेत. तर शहरातील सर्वच भागातून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत होती त्यामुळे दौंडकरांच्या चांगल्या आरोग्यासाठी शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी दौंडचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. शहरातील वाढती रुग्णांची संख्या पाहून प्रांताधिकारी यांनी आजपासून दौंड शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. मात्र याची अंमलबजावणी आजपासून कडकपणे राबविली जात आहे. याआधीच दौंडमधील व्यापाऱ्यांनी व्यापारपेठ बंद ठेवण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे आता त्यांचेही प्रशासनाला सहकार्य मिळणार आहे. शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासन कडक पाऊल उचलून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर वर बेधडक कारवाई करणार आहे.
कोरोना महामारीत संचारबंदीत शिथिलता आणली गेली.याचा गैरफायदा आता काही असामाजिक तत्त्व घेताना पाहायला मिळत आहेत.चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन सराईत गुन्हेगारांनी एका व्यक्तीला आम्ही कोरोना अधिकारी असल्याची बतावणी करून त्याची झाडाझडती घेतली आणि त्याच्याकडील एटीएम कार्ड हातचलाखीने काढून घेतले. या एटीमच्या आधारे या इसमाच्या बँक खात्यातून या भामट्यांनी तब्बल 54 हजार रुपये काढून घेतले होते. याप्रकरणी फिर्यादीने चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. चेंबूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने यावर तात्काळ तांत्रिक बाबींच्या मदतीने तपास करून सोहन गणेश वाघमारे आणि सागर केतन कदम या दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींसह पोलिसांनी गुन्ह्यातील होंडा सिटी कार आणि एटीएम कार्ड जप्त केले असून पोलीस अधिक तपास करत आहे.हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.सध्या कोरोना ने धास्तावलेल्या नागरिकांची अशी देखील फसवणूक होऊ शकते त्यामुळे सावधानता बाळगण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी दवाखाने रुग्णालये आज ही कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करीत असून त्या सोबतच महानगरपालिका प्रशासनाने जी कोविड रुग्णालये घोषित केली आहेत. तेथील अनागोदी कारभार विरोधात संतप्त काँग्रेस नगरसेवकांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणि मुख्यालयात निदर्शने करीत या दुरावस्थेकडे डोळेझाक करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केलं. मात्र लवकरच आरोग्य सेवा सुधारली नाही तर आयुक्तांचा घेराव करणार असल्याचा इशारा काँग्रेस नगरसेवकांकडून देण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उद्यापासून संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात पालकमंत्र्यांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी संपूर्ण जिल्ह्यात 7 जुलै ते 21 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊन दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत सर्व दुकानांना परवानगी देण्यात येणार आहे. इतर वेळेस मात्र, कडक कर्फ्यु असणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.
पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली
,
यंदाच्या पावसाळ्यात राजाराम बंधारा दुसऱ्यांना पाण्याखाली
,
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी धरण क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा वाढला
,
राधानगरी आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली
,
यंदाच्या पावसाळ्यात राजाराम बंधारा दुसऱ्यांना पाण्याखाली
,
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी धरण क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा वाढला
,
राधानगरी आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात काल (5 जुलै ) फोनवरुन संवाद झाला. भारत-चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये बातचीत झाली. यानंतरच लडाखमधील गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य मागे हटलं.
सांगलीच्या शिराळा पश्चिम भागात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने वारणा नदी वरील कोकरूड आणि रेठरे पूल पाण्याखाली गेला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र वारणा धरण परिसरात दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. नदीवरील असलेला कोकरूड आणि रेठरे पूल पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. तर काही ओढे ही भरून वाहू लागले आहेत.
औरंगाबाद : 10 ते 18 जुलैदरम्यान औरंगाबादमध्ये कर्फ्यु, वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता निर्णय, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या बैठकीत निर्णय, उद्योगही बंद राहणार, औरंगाबाद शहर आणि वाळूज परिसरात संचारबंदी
ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 अंतर्गत असलेल्या शांतीनगर पोलिस ठाणे येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक (ममता डिसुझा) या कर्तव्य बजावत असतांना त्यांना घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास अशा प्रकारच्या सिमटन्स जाणवत असल्याने स्वॅब चाचणी करण्यात आली होती. त्यांचा कोरोना अहवाल आला असून त्या पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यांच्यासह 5 कर्मचाऱ्यांची रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र असे असताना देखील पोलीस मोठ्या हिम्मतीने आपल कर्तव्य बजावत आहेत .
सरकारी अधिकारी असल्याचं सांगून कोरोनाच्या सर्वेक्षणासाठी आल्याचं भासवत भामट्यांनी एका महिलेचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा कनोजिया या 48 वर्षीय महिला नाणेगाव रोड परिसरात लॉन्ड्रीचे दुकान चालवतात, शनिवारी दुपारी दोन इसम त्यांच्या दुकानात आले आणि त्यांनी आम्ही देवळाली कँटोनमेन्ट बोर्डाकडून आल्याचं सांगत मास्क वापरा, सॅनेटायझर लावा असे सांगत बोलण्याच्या नादात गुंतवत कनोजिया यांना त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपयांची सोन्याची पोत काढून देण्यास सांगितली आणि काही क्षणातच ते फरार झाले. विशेष म्हणजे सॅनेटायझरच्या नावाखाली त्यांनी काहीतरी गुंगीचे औषध देखील फवारल्याचा महिलेला संशय आहे. महिलेच्या समोरच त्यांनी एका तरुणाला देखील मारहाण करून त्याच्याकडील पैसे काढून घेतल्याचं महिला सांगत असून तो तरुण देखील चोरांच्या टोळीतील असावा असा अंदाज वर्तवला जातोय.
जालना शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने आजपासून 10 दिवस लॉकडाऊन घोषित केले आहे. नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून आज संपूर्ण शहरात पोलिसांची गस्त सुरु आहे. आज शहरात पोलिसांनी बाईक रॅली काढून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना कडक इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी म्हंटलं आहे. आजपासून 10 दिवस केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता शहरात संपूर्ण बंद असणार आहे. दरम्यान आज या बंदचा सकारात्मक परिणाम देखील पाहायला मिळत असून, संपूर्ण दुकाने बंद तर आहेतच मात्र रस्त्यावर पोलिसांशिवाय कोणीही पाहायला मिळत नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत आहे. कारण जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल 40 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांचा आकडा 750 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 484 जणांनी कोरोनावर मात केली असून 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत लॉकडाऊनची निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड हे देखील होम कॉरंटाइन. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला असता आयुक्तांच नावही समोर आलंय. त्यामुळं शेखर गायकवाड हे आज महापालिकेत न येता घरीच थांबलेत. आज किंवा उद्या त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. या आधी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्कात आलेल्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर रामचंद्र हंकारे हे होम कॉरंटाइन झालेले आहेत.
वसईत पिवळ्या बेडकांचा डराव डराव सुरु झाला आहे. 4 दिवसांपासून पालघर जिल्ह्यात धुव्वांधार पावसाने हजेरी लावली आहे. याच पावसात वसईच्या नवाळे येथील विशाल वर्तक यांच्या शेतजमिनीत ही दुर्मिळ असणारी पिवळ्या बेडकांच्या प्रजातीची शाळा भरली आहे. दुर्मिळ जातीच्या पिवळ्या बेडकाचा डराव डराव हा सध्या वसई तालुक्यात कुतूहलाचा विषय ठरत आहे.
सिमेंट काँक्रिटीकरणाचे जंगल वसईत वाढले आहेत. तरीही हिरवळ जपण्यासाठी पश्चिम पट्ट्यात प्रयत्न केले जात आहेत. याच जपलेल्या हिरवळीत दुर्मिळ जातीच्या पिवळ्या बेडकांचा डराव डराव कदाचित निसर्ग जपण्याचाच एक संदेश देत असल्याचा भास होत आहे.
नागपूर-

निसर्ग चक्रीवादळानंतर कोकणात विस्कळीत झालेले वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी विदर्भातून रायगडला गेलेले महावितरणचे कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत.

रायगडमधून परतलेले 7 कर्मचारी कोरोना बाधित आढल्यानंतर उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन राहण्याचे निर्देश दिले आहे.

कोरोना बाधित आढळलेले 7 कर्मचारीपैकी वर्धा जिल्ह्यातील 5 आणि नागपूर जिल्ह्यातील 2 आहेत.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मधील 3 तर देवळी आणि पुलगाव चे एक एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. तर नागपूर जिल्ह्यातील वाडी आणि बुटीबोरी मधील कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहे.

आता महावितरण ने कोकणात गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे ठरविले असून तोवर या कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे.

विदर्भातील विविध जिल्ह्यातून 200 कर्मचारी कोकणात गेले होते अशी प्राथमिक माहिती आहे.

नागपूर जिल्ह्यातील वाडी मध्ये महावितरण चा कोरोना बाधित आलेला कर्मचारी राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे.
परप्रांतीय मजुरांच्या स्थलांतरणामुळे राज्यातील उद्योग क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सरकार लेबर ब्युरोची स्थापना करणार आहे. आज दुपारी 1.30 वाजता उद्योग मंत्री सुभाष देसाई याबाबत घोषणा करतील. या लेबर ब्युरोवर नोकरीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ज्यामध्ये 80 % भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं जाईल. यासाठी कुशल - अकुशल कामगार नोकरीसाठी नोंदणी करू शकतात. यामुळे लाखो तरुणांना नव्याने रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचा सरकारचा दावा आहे.
परप्रांतीय मजुरांच्या स्थलांतरणामुळे राज्यातील उद्योग क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सरकार लेबर ब्युरोची स्थापना करणार आहे. आज दुपारी 1.30 वाजता उद्योग मंत्री सुभाष देसाई याबाबत घोषणा करतील. या लेबर ब्युरोवर नोकरीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ज्यामध्ये 80 % भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं जाईल. यासाठी कुशल - अकुशल कामगार नोकरीसाठी नोंदणी करू शकतात. यामुळे लाखो तरुणांना नव्याने रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचा सरकारचा दावा आहे.
परभणीच्या सेलू तालुक्यात हरणांचे कळप शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. कुपटा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पेरलेलं पीक हरणं फस्त करत आहेत. 100 ते 150 हरणांचा कळप ज्याच्या शेतात गेला, तिथलं एक एक एकरवरील पिकं खाऊन फस्त करुन याच परिसरात मुक्काम करत आहेत. दिवसा तर दिवसा रात्रीही हे कळप शेतकऱ्यांचं मोठे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांना 24 तास शेतात पहारा द्यावा लागत आहे. त्यामुळे या नुकसानीकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ या हरणांच्या कळपाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
परभणीच्या सेलू तालुक्यात हरणांचे कळप शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. कुपटा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पेरलेलं पीक हरणं फस्त करत आहेत. 100 ते 150 हरणांचा कळप ज्याच्या शेतात गेला, तिथलं एक एक एकरवरील पिकं खाऊन फस्त करुन याच परिसरात मुक्काम करत आहेत. दिवसा तर दिवसा रात्रीही हे कळप शेतकऱ्यांचं मोठे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांना 24 तास शेतात पहारा द्यावा लागत आहे. त्यामुळे या नुकसानीकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ या हरणांच्या कळपाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी वाढदिवस साजरा केल्याचा फोटो व्हायरल झाल्याने सध्या त्या ट्रोल होत आहेत. गीता जैन आणि त्यांचे पती भरत जैन हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सध्या ते दोघे घरीच क्वॉरन्टाईन झाले आहेत. मात्र गीता जैन यांचा 5 जुलै रोजी वाढदिवस होता. त्यावेळी घरीच आपल्या पतीसोबत केक कापून त्यांनी वाढदिवस साजरा केला. तसंच पतीलाही केक भरवला. परंतु कोरोना पॉझिटिव्ह असताना एखाद्या आमदाराने असं कृत्य करुन, त्याचे फोटो शेअर करणं चुकीचं असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं. या फोटोमध्ये फोटोग्राफर आणि आणखी काहीजण दिसत आहेत.
याबाबत गीता जैन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचळला नाही. माञ त्यांच्या समर्थकांकडून “कोणत्याही कठीण परिस्थीतिशी हसतमुख लढलं पाहिजे” असा संदेश गीता जैन या देत असल्याच म्हणतं फोटोचं समर्थन केलं आहे.

गीता जैन यांनी सहा दिवसापूर्वी कोरोना टेस्ट केली होती. तर त्यांचे पती भरत जैन यांनी तीन दिवसापूर्वी कोरोना टेस्ट केल्याची माहिती समोर येत आहे.
मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईद्दू मुकादम चौकात संध्याकाळच्या सुमारास दुचाकी बाजूला न घेतल्याचा रागातून बाचाबाची झाली. त्यानंतर चक्क पिस्तुलाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. नगरसेवक मन्सूर अहमद यांचे बंधू कमर हमीद शब्बीर अहमद हे ईद्दू मुकादम चौकात एका दुकानासमोर दुचाकीवर उभे होते. मुजाहिद नावाचा रिक्षाचालक इथून जात असताना त्याने दुचाकी बाजूला घेण्यास सांगितलं. परंतु चिखल असल्याने दुचाकी बाजूला घेणे शक्य नसल्याचं सांगत रिक्षा बाजूने काढण्यास सांगितलं. याचाच राग आल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळानंतर भांडण मिटवून घेण्याचे ठरल्याने नगरसेवक मन्सूर अहमद आणि त्यांचे भाऊ चौकात जमा असताना, शेरा नावाच्या तरुणाने इथे येऊन पिस्तुल काढून धमकवले आणि एक गोळी हवेत झाडली. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत रमजानपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं.
बंदी झुगारुन लोणावळ्यात वर्षाविहारासाठी येणं पर्यटकांना महागात पडलंय. आतापर्यंत असा उतावळेपणा करणाऱ्यांवर पोलिसांनी 131 गुन्हे दाखल केले आहे. आधीच जीव धोक्यात घालून काही पर्यटक लोणावळ्यात येत होते. अशात शनिवारी भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे पर्यटकांना राहावेना, ते लोणावळ्यात आले. पण त्यांची ही हौस पोलिसांनी भागवली. पर्यटकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे दिलेले आदेश धुडकवले म्हणून 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि विना मास्क फिरल्याने दंडाची कारवाईही करण्यात आली आहे.
औरंगाबाद वैजापूर शहरात एक कोरोना रुग्ण बरा होऊन आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सदरील रुग्ण वैजापूर नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष आहे. शेख वकील शेख गफूर असं त्याचं. त्याच्या स्वागतासाठी फटाके फोडण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला होता. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून कंटेन्मेंट एरियात एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे हा असा कंटेन्मेंट एरिया आहे कि जिथं शंभर मीटरच्या परिघात जवळजवळ 70 पेशंट आढळून आले आहे. वैजापुरात जनता कर्फ्यू असताना ही दृश्य पहायला मिळाली
नाशिक - हॉटस्पॉट नाशिक शहरात कोरोनाचा कहर सुरुच, रात्री प्राप्त झालेल्या अहवालात शहरात 43 नवे पॉझिटीव्ह, काल एकाच दिवसात शहरात तब्बल 205 बाधित आणि 5 मृत्यूची नोंद, शहरातील रुग्णसंख्या 2,985 वर आतापर्यंत 132 मृत्यू, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,391 वर, आतापर्यंत 277 बळी, जिल्ह्यात सध्या 2,130 रुग्णांवर उपचार सुरु तर 2,984 बाधितांना डिस्चार्ज
निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरता रत्नागिरी जिल्ह्याला 116 कोटी निधी प्राप्त झाला असून 54 कोटीचं वाटप पूर्ण; ऑनलाईन पत्रकार परिषदेत उदय सामंत, अनिल परब यांची माहिती

लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे हेच भाजपच्या आत्मनिर्भर अभियानाचे काम; जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांची टीका
मुंबईमध्ये सलग दोन दिवस कोसळत असलेल्या पावसाने आज पूर्णपणे उसंत घेतली आहे. यामुळे गेले तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाणी भरलेल्या ठिकाणी स्थिती सध्या सामान्य आहे. मुंबईच्या किंग सर्कल परिसरात थोड्या पावसाने देखील मोठ्या प्रमाणत पाणी भरलेले असते. मात्र सध्या इथे देखील रस्ता सुरुळीत झाला आहे.

पार्श्वभूमी

जगभरात कोरोना महामारीचा धोका वाढत चालला आहे. जगात 1.21 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगात एक कोटी 21 लाख 55 हजार कोरोनाबाधिता आहेत. तर कोरोनामुळं मृत्यूची संख्या 5 लाख 51 हजार वर गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 70 लाखांहून अधिक लोकं कोरोनामुक्त झाली आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 3,158,726 कोरोनाबाधित आहेत. अमेरिकेत 134,853 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. तर ब्राझिल दुसऱ्या नंबरवर असून 1,716,196 लोकं तिथं बाधित झाली आहेत. तर 68,055 लोकांचा मृत्यू झालाय. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 769,052 कोरोनाबाधित आढळले आहेत तर आतापर्यंत 21,144 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.