मुंबई : ठाणे पोलिस दलातील एक महिला पोलिस अधिकारी गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत.


 
एप्रिल महिन्यात कार्यालयात गेलेल्या 37 वर्षीय बिद्रे पुन्हा घरी परत आलेल्या नाहीत. 15 एप्रिल 2016 पासून कामाच्या ठिकाणाहून कोणास काहीएक न सांगता त्या निघून गेल्याचा दावा हरवल्याच्या तक्रारीत करण्यात आला आहे.

 
बिद्रे कुटुंबियांनी गुरुवारी म्हणजे तब्बल तीन महिन्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद झालं आहे.