Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी एक फेसबुक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये राजू शेट्टी यांनी राजकारणी लोक समाजा समाजात, जाती, धर्मात कसे भांडण लावतात याचा दाखला दिला आहे. हे सांगताना राजू शेट्टी यांनी एक उदाहण दिले आहे. या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी समाजात भांडणे लावणारे लोक आपल्या लक्षातच येत नसल्याचे म्हटले आहे. आपण अशा लोकांना ओळखायला शिकलं पाहिजे, अन्यथा एकमेकांत लढून मरणे हेच आपले भाग्यामध्ये असेल असे शेट्टींनी म्हटले आहे.


राजू शेट्टींनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलय
 
जर तुम्ही 100 काळ्या मुंग्या आणि 100 तांबड्या मुंग्या घेतल्या व एका काचेच्या जारमध्ये सोडल्या तर काही घडणार नाही. मुंग्या एकमेकांत मिसळून जातील. पण जर तुम्ही काचेचा जार कसलीही दया माया न दाखवता जोर-जोरात हलवलात आणि टेबलावर ठेवलात. तर तुम्हाला दिसेल की दोन्ही मुंग्या एकमेकाला मारायला सुरुवात करतात. काळ्या मुंग्यांना वाटते की, तांबड्या मुंग्यामुळे आपला जीव धोक्यात आहे. तसेच तांबड्या मुंग्यानाही वाटते की काळ्या मुंग्या आपल्या जीवावर उठलेत. काळ्या आणि तांबड्या मुंग्या एक दुसऱ्याला शत्रू समजायला लागतात. जार हिंस्रपणे हलवणारे हात त्यांच्या लक्षातच येत नाहीत. हेच आपल्या समाजात घडत असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.


समाज नेहमीच शांत, समंजस असतो. राजकारणी हिंस्र हातांनी ढवळून काढलेला समाज आपल्या लक्षातच येत नाही. मग  लिंग, जाती, धर्म यांनी बनलेला समाज एकमेकांच्या विरोधात उभा ठाकतो. एकमेकाला शत्रू मानायला लागतो. आपण हे हात ओळखायला शिकलं पाहिजे. अन्यथा एकमेकांत लढून मरणे हेच आपले भाग्यामध्ये असेल, असेही शेट्टींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: