आंदोलनात सलग दोन दिवस एसटीच्या 217 बसेसची मोडतोड झाली. त्याचे सुमारे 1 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तसेच या बंद काळात 250 आगारांपैकी 213 आगारक्षेत्रीतील बहुतांश एसटीची वाहतूक ठप्प झाल्यामुळे 19 कोटी रुपयाचा महसूल बुडाला.
हे झालेलं नुकसान भरून न निघणारं असून आंदोलन काळात तोडफोड झालेल्या बसेस भविष्यात दुरुस्त होऊन रस्त्यावर सुरळीत धावेपर्यंत एसटीला तिच्या दैनंदिन महसूला पासून वंचित राहावं लागणार आहे. त्याचा सध्या स्थितीला अंदाज वर्तविणं कठीण आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
भीमा-कोरेगाव इथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.