"मागील चार महिन्यांपासून राज्यातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळालेलं नाही. तसंच मागील दीड वर्षापासून कायमच विद्यावेतनासाठी मार्डच्या डॉक्टरांना आंदोलन करावं लागत आहे. विशेष म्हणजे आंदोलन केले की एखाद्या महिन्याचे विद्यावेतन मिळते, मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे अशीच होते. त्यामुळे चारही महिन्यांचे विद्यावेतन मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही", अशी भूमिका मार्डच्या डॉक्टरांनी घेतली होती.
परंतु राज्यातील पूरस्थिती आणि आजारांचा प्रादुर्भाव पाहता हा संप मागे घेतल्याचं मार्डच्या प्रतिनिधींनी सांगितलं. मात्र सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर 31ऑगस्ट रोजी पुन्हा संप पुकारण्यात येईल, असा इशाराही मार्डने दिला आहे.
बैठकीत मान्य झालेल्या मागण्या
- नागपूर, लातूर, अकोला आणि अंबाजोगाई इथल्या निवासी डॉक्टरांचे थकलेले विद्यावेतन लवकरात लवकर देणार
- टीबी झालेल्या डॉक्टरांच्या सुट्टीची मागणी आणि प्रसुती रजा मान्य
- येत्या 15 दिवसात कॅबिनेट मीटिंगमध्ये विद्यावेतनवाढीच्या मागणी मांडणार
- पाच हजार रुपयांनी वाढलेलं निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन पुढच्या महिन्यापासून त्यांच्या अकाऊंटवर क्रेडिट करणार