मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसून येतंय. एसटी आरक्षण प्रणाली (ST Bus Reservation) ठप्प झाल्याने प्रवास कसा करायचा असा प्रश्न आता पडला आहे. आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याचा फटका प्रवाशांसह एसटी महामंडळालाही बसत असल्याचं चित्र आहे. तसेच नवीन प्रणालीमुळे कर्मचारीही वैतागले आहेत.
एसटी आरक्षण प्रणाली सॉफ्टवेअर आणि कंपनीमध्ये दोन वर्षाआधी महामंडळाने बदल केला आहे. त्या माध्यमातून जुन्या आरक्षण प्रणालीच्या जागी नवीन आरक्षण प्रणाली आणली. पण सदर प्रणाली ही सोयीस्कर होण्याऐवजी जास्तच किचकट होत असल्याचं चित्र आहे. ऐन दिवाळीच्या मोक्यावरती आरक्षण प्रणाली पूर्ण बंद पडली असून प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.
ST Bus Reservation : नव्या प्रणालीमुळे खर्चही वाढला
कर्मचाऱ्यांना मेमो देणे, मशीन इश्यु करणे या साठी आधी एका गाडीसाठी आरक्षण मेमो प्रिंट काढतांना एक कागद लागत होता. आता एकाच मेमोची प्रिंट घेण्यासाठी तीन कागद लागतात. त्यामुळे महामंडळाचा खर्चही वाढल्याचं दिसून येतंय.
ST Bus Booking : कर्मचारीही वैतागले
काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरती सांगितले की, आधीची आरक्षण प्रणाली ही खूप छान आणि सोयीस्कर होती. पण आता जी आरक्षण प्रणाली आहे ती अतिशय अवघड आणि खूप किचकट करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा या आरक्षण प्रणाली वर काम करताना खूप त्रास होत आहे.
ST Bus News : 12 हजारांची उचल देण्याचा निर्णय
राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी हात खुला करण्यात आला. राज्य सरकारकडून 48 हफ्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 2200 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली.
यंदा दिवाळीनिमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजे बोनस देण्यात येणार आहे. त्याचसोबत 12 हजार रुपयांच्या उचलसंदर्भात देखील घोषणा करण्यात आली.
'आवडेल तिथे प्रवास' पासच्या दरात कपात
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळीच्या आधी 'आवडेल तिथे प्रवास' योजनेच्या पासमध्ये कपात करून प्रवाशांना खुशखबर दिली आहे. एकूण 20 ते 25 टक्के कपात केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
'आवडेल तिथे प्रवास' या योजनेअंतर्गत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा मिळते. या योजनेत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कोणत्याही एसटी बसने अमर्याद प्रवास करण्याची मुभा मिळते. एसटीचा चार किंवा सात दिवसांचा पास घेतल्यावर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नसते.
ही बातमी वाचा: