दहावीच्या निकालाबाबत सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने पत्रक काढून याबाबची महत्वपूर्ण घोषणा केली.
शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाबाबत अजून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही तारखेवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही शिक्षण मंडळाने केलं आहे.