विधान भवन, लोकसभा यांच्याइतकीच ग्रामसभा महत्त्वाची आहे. ग्रामसभेने बुलेट ट्रेन नको असल्याचे प्रस्ताव मंजूर केलेत, आता हे प्रस्ताव दिल्ली आणि पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ज्या 70 गावांनी बुलेट ट्रेनला विरोध केला आहे, त्याच गावांमधून आपण संघर्ष यात्रा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बुलेट ट्रेनविरोधाची दिशा ठरवण्यासाठी पालघऱमध्ये आज बैठक बोलावण्यात आली होती. ज्यात गोऱ्हेंसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.