- राज्यात पुढील पाच वर्ष स्थिर सरकार असेल, फक्त सगळं ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे : संजय राऊत
- शिवसेनेला सत्तेच्या '50-50' आग्रहासाठी अडचणीचा आहे 'हा' इतिहास!
- उपमुख्यमंत्री पद आणि 13 मंत्रिपदं-भाजपकडून शिवसेनेला 'ऑफर'
- अपक्ष आमदारांसाठी रस्सीखेच, शिवसेनेकडे 63 तर भाजपकडे 115 आमदारांचं संख्याबळ
मुख्यमंत्रिपदासह सत्तेचं समान वाटप हीच शिवसेनेची भूमिका : संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम | 31 Oct 2019 12:48 PM (IST)
सत्तास्थापना आणि खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतल्याची चर्चा होती. महायुतीचं सरकार हे राज्यासाठी भल्याचं असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
मुंबई : मुख्यमंत्रिपदासह सत्तेचं समसमान वाटप व्हावं हीच शिवसेनेची भूमिका आहे. भाजपने दिलेला शब्द पाळला पाहिजे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक सूर आळवला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. सत्तास्थापना आणि खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतल्याची चर्चा होती. महायुतीचं सरकार हे राज्यासाठी भल्याचं असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. याबाबत ते म्हणाले की "शिवसेनेने एक पाऊलही मागे घेतलेलं. जे हक्काचं आहे, न्यायाचं आहे ते आम्ही मागतोय. मी फक्त एवढंच म्हणालो की, या क्षणी युती आहे आणि युतीत बोलणी होऊ शकते. यात नरमाईची भूमिका कशी झाली म्हणता?" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शाह यांच्यासमोर म्हणाले होते की, सत्तेच्या पदांचं समसमान वाटप होईल. या अर्थ काय होतो? सत्तेच्या पदात मुख्यमंत्रिपद येत नाही का? मुख्यमंत्रिपद एनजीओचं पद आहे का? ते सत्तेचं पद आहे. उद्धव ठाकरेही 50-50 पॉवरशिप म्हणाले होते, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. संबंधित बातम्या