Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) धिक्कार करणं गरजेचं होतं. मात्र, ते तोंड शिवून गप्प बसल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, राज्य सरकारकडून शिवप्रताप दिन साजरा करणं हे ढोंग असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला. उदयनराजे यांचे अश्रू आम्ही पाहिले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहेत. त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केल्याचे राऊत म्हणाले.


मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हतबल


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचं महत्व अधिक वाढलं असतं असे राऊत म्हणाले. महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजभवनात असल्याचे राऊत म्हणाले. शिवरायांचा अपमान ऐकण्यापेक्षा मरण का आलं नाही? ही उदयनराजेंची भावना महाराष्ट्राची भावना असल्याचे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हे हतबल सरकार असल्याचे ते म्हणाले. 


...तरीही सरकार तोंड शिवून बसलंय 


मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही. कारण छत्रपती शिवरायांचा राज्यपालांनी अपमान करुनही मुख्यमंत्री अद्याप गप्प आहे. ते काहीही बोलायला तयार नसल्याचे राऊत म्हणाले. शिवप्रताप दिनाचा उत्सव हा महाराष्ट्रात दरवर्षी होत असतो. शिवप्रताप दिनाचा महत्त्व समजून घ्या, असेही राऊत म्हणाले. शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल अजून राजभवनात आहेत  आणि सरकार तोंड शिवून गप्प बसलं असल्याचे ते म्हणाले. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते हे देखील शिवाजी महाराजांवरती बोलून, त्या पदावर बसलेले आहेत. असं असताना तुम्ही त्यांचं समर्थन करत आहात असे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. अशा मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का ? असा विचार या राज्यातील जनता करत असल्याचे राऊत म्हणाले. 


कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीत, आमचे मुख्यमंत्री कुठे?


बेळगावच्या समन्सला आम्ही वकील पाठवले आहेत. त्यानंतर पुढली तारीख असेल, त्या पुढल्या तारखेला मी उपस्थित राहणार असल्याचे राऊतांनी सांगितलं. कर्नाटक सीमा वादावर सुनावणी झाली तर होईल. त्याची आम्ही सगळेच वाट पाहत असल्याचे ते म्हणाले. सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत, आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत?  हा मोठा प्रश्न असल्याचे संजय राऊत म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Udayanraje Bhosale News : प्रतापगडावरील शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाला उदयनराजे उपस्थित राहणार नाहीत