मुंबई : पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या मृत्यूनंतर शिवसेनेने गृहखात्यासाठी पूर्णवेळ मंत्री द्यावा अशी मागणी उचलून धरली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडे गृहखातं असतं तर गुंडांवर दहशत बसली असती असा दावाही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


 
पोलिसांवर हल्ल्याची प्रकरणं वाढली आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री सक्षम आहेत, त्यांचा आदर करतो, पण गृह खात्यावर 24 तास काम करणारी व्यक्ती हवी, अशी अपेक्षा त्यांनी भाजपकडून केली आहे.

 
यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीनेही पूर्णवेळ गृहमंत्री देण्याची मागणी केली आहे. आता युतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेकडूनच ती मागणी आल्यानं आता तरी मुख्यमंत्री गृहखात्याचा मोह टाळून त्यासाठी स्वतंत्र मंत्र्यांची नेमणूक करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

विलास शिंदेंची मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा, कुटुंबीयांची माहिती


 
पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदेंना 23 ऑगस्टला कर्तव्य बजावत असताना दोन मुलांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. आठ दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि बुधवारी विलास शिंदेंची प्राणज्योत मालवली.


मारहाणीत जखमी झालेले पोलीस शिपाई विलास शिंदेंचं निधन


 

साताऱ्यातील शिरगाव या मूळगावी अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरगावकरांनी साश्रू नयनांनी विलास शिंदे यांना अखेरचा निरोप दिला.


मारहाणीत जबर जखमी झालेल्या पोलिसाच्या भेटीला राज ठाकरे