मुद्दा १-
"शिखर बँक घोटाळाप्रकरणी माझं (शरद पवार) नाव आल्यानं अजित पवार अस्वस्थ होते"- पवार
मुद्दा २-
"राजीनामा देण्यापूर्वी आणि दिल्यानंतरही त्यांनी माझ्याशी चर्चा केली नाही"- पवार
मुद्दा ३-
"आजचं राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. यातून बाहेर पडावं आणि शेती करावी, अशी चर्चा अजित पवारांनी कुटुंबियांसमवेत केली. मुलालाही राजकारणात न येण्याचा सल्ला दिला"- पवार
मुद्दा ४-
"अजित पवारांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण होऊ शकला नाही. मात्र, कुटुंबप्रमुख या नात्यानं मी यात लक्ष घालणार"- पवार
मुद्दा ५-
"पवारांमध्ये कुटुंबप्रमुखाचा शब्द अंतिम असतो. आमच्यात कोणतेही वाद नाहीत"- पवार
मुद्दा ६-
"तलवार हाती घेतल्यावर जिंकण्यासाठीच युद्ध करायचं. अजित युद्ध मध्येच सोडणार नाही"- पवार
मुद्दा ७-
"अजित पवारांच्या राजीनाम्याचा निवडणुकीवर परिणाम नाही"-पवार
मुद्दा ८-
अजित पवारांनी राजकीय संन्यास घेण्यावरून विचारलेल्या प्रश्नाला पवारांनी खोडून काढले.
मुद्दा ९-
पत्रकार परिषदेनंतर अजित पवारांची भेट घेण्यास पवार मुंबईला रवाना
मुद्दा १०-
रोहित पवार यांनीही पत्रकार परिषदेबाहेर पत्रकारांना कुटुंबात वाद नसल्याचं सांगितलं. मात्र, पार्थ पवार यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी फक्त त्याला राजकारणातून बाहेर होण्यास सांगितलं, ते स्वत:बद्दल बोलले नाहीत, हे स्पष्ट केलं.