गडचिरोलीमध्ये CRPF चे सात जवान 150 नक्षल्यांना पुरुन उरले
एबीपी माझा वेब टीम | 27 Nov 2017 11:13 PM (IST)
नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटानंतर कोम्बिंग ऑपरेशनसाठी गेलेल्या पोलीस पथकाला रविवारी ग्यारापत्ती जंगलामध्ये सुमारे 150 नक्षलवाद्यांनी घेरलं. यानंतर नक्षल्यांनी बेछूट गोळीबार केला. पण सात जवानांनी औलोकिक पराक्रम गाजवत 150 नक्षल्यांना झुंजवलं.
फाईल फोटो
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढवय्या सरनोबतांपैकी प्रतापराव गुजर यांनी नेसरीच्या खिंडीत बेहलोल खानाला दिलेली लढाई आपण इतिहासात वाचली आहे. या घटनेवरील ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गीत ऐकून अनेकांना स्फूरण चढतं. पण अशीच एक लढाई काल गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात घडली. नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटानंतर कोम्बिंग ऑपरेशनसाठी गेलेल्या पोलीस पथकाला रविवारी ग्यारापत्ती जंगलामध्ये सुमारे 150 नक्षलवाद्यांनी घेरलं. यानंतर नक्षल्यांनी बेछूट गोळीबार केला. पण सात जवानांनी औलोकिक पराक्रम गाजवत 150 नक्षल्यांना झुंजवलं. संध्याकाळी 6 वाजता सुरु झालेली ही चकम अनेक तास सुरु होती. पण सीआरपीएफच्या फक्त सात जवानांनी तब्बल 150 नक्षल्यांचा निधड्या छातीने मुकाबला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे मंजुनाथ निजलिंगाप्पा शहीद झाले. तर लोकेश कुमार आणि दीपक शर्मा जखमी झाले. या सात जणांच्या मदतीसाठी गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त कुमक निघाली. पण रात्र असल्याने मदत वेळेत पोहोचू शकली नाही. तरीही आपल्या जाँबांज जवानांनी नक्षलवाद्यांचा चोख प्रत्युत्तर दिलं.