Transfers of Police Inspectors : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरूवारी महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यात बदलापूर अत्याचार प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे-शिंदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या बदलीसाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी मागवण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्यातील 22 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई पोलीस दलात 14 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.


कोणाची कुठं झाली बदली


ठाणे शहर येथील अजय आपळे, नंदकुमार कैचे, गंगाराम वळवी, महादेव कुंभार, स्वाती पेटकर, अशोक भगत, चंद्रहार गोडसे, अनिल पडवळ, अनिल जगताप, संदीप धांडे, अतुल अडुरकर तर नवी मुंबईतील विजयकुमार पन्हाळे व संजीव धुमाळ यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. तर बदलापूर येथील पोलीस ठाण्यातील निलंबीत पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे-शिंदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे. याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली सरवदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे.


राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


दरम्यान, राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा बंगलयावर मुख्यमंत्री आणि रश्मी शुक्ला यांच्यात महत्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे. बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींसोबत झालेल्या दुर्दैवी घटना आणि त्यानंतर उदभवलेल्या परिस्थितीवर दोघं मध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील एकंदरीत कायदा सुव्यवस्थावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. आजच बदलापूर प्रकरणात मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली होती. सुनावणी दरम्यान न्यायायाने संबंधित  पोलीस प्रशासनाचा भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित  केले होते. या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची ही बैठक महत्वाची मानली जात आहे.


बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. शाळेतील दोन चिमुकल्यांचं शाळेतीलच कंत्राटी पद्धतीने रुजू झालेल्या कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केलं आहे. बदलापूरमधील या घटनेचे पडसाद सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


'बदलापूर प्रकरण दाबण्याचं काम', माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारला फटकारलं म्हणाले, "जाड चामडीचे सरकार.."