मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला भ्रराष्टाचाराचे गालबोट लागल्याचे उघडकीस आलं आहे. राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामात गैरव्यवहार झाल्याची कबुली खुद्द जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. आज प्रश्नोत्तराच्या तासात जलसंधारणासंदर्भात विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न विचारला असता ही बाब समोर आली आहे.


विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंच्या प्रश्नाला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर देताना राज्यातील पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार शिवरच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केलं आहे. तसेच या प्रकरणाची प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुप्त चौकशी केल्याचे छापील उत्तरात नमूद केले आहे.

या प्रकरणी चौकशीत तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे लेखी उत्तर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहे. तसेच जिथे जिथे अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत अशी 1300 जलयुक्त शिवाराची कामे निवडली असून जिथे जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करुन विभागीय चौकशी सुरु आहे. अशी माहिती धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी दिली.

याबाबत तांत्रिक अहवाल आल्यावर या प्रकरणात एसीबी चौकशी करायची की नाही हा निर्णय घेऊ असही मंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवर योजनेला ही भ्रराष्टाचाराचे गालबोट लागल्याचे आज सरकारने मान्य केले.

Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी मुख्यमंत्र्यांचे डावपेच, लवकरच नियुक्ती | ABP Majha