सरसंघचालक मोहन भागवत घरवापसी संदर्भात म्हणतात...
एबीपी माझा वेब टीम | 16 Oct 2016 07:35 PM (IST)
रत्नागिरी: लाचारीपोटी धर्म परिवर्तन करणाऱ्यांना पुन्हा वृक्षांच्या मुळावर उभं करणं, म्हणजे घरवापसी आहे, अशी व्याख्या सरसंघचालक मोहन भागवतांनी रत्नागिरीत सांगितली. नाणिजधाम इथं आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान संकल्पपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. नैसर्गिकरित्या जे मिळालंय त्याचा काहींना विसर पडलाय. अशांना त्याची आठवण करून देणं म्हणजे घरवापसी, असं भागवत यावेळी म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ सरसंघचालकांनीही नरेंद्र महाराजांच्या नाणीज मठात हजेरी लावली. पण वादाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी, मनोहर पर्रिकर आणि अनंत गिते यांच्यासारख्या दिग्गजांनी मात्र मठात हजेरी लावणं टाळलं.