भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त खत वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी सदाभाऊ खोत उपस्थित होते. याप्रसंगी, बोलताना सदाभाऊ खोत यांनी कोकणातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असून कोकणातील फळ लागवड, अन्न प्रक्रियेला चालना देण्यासाठी अन्न प्रकिया अभियान सुरु करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
तर, कोकणातल्या नाचणी, तांदूळ, फळे, लोणची यांना बाजारपेठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितलं.